vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता…

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता…

राज्य प्रतिनिधी

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात यादरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी #गारपीट होऊ शकते.

१९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २० आणि २१ एप्रिल रोजी पावसाची व्याप्ती वाढण्याचे संकेत आहेत. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह (पुणे विभाग) मराठवाडा (प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भात (प्रामुख्याने अमरावती विभाग) देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. तथापि, २२ तारखेला वादळी पावसाची व्याप्ती आणि त्याचा प्रभाव कमी होईल.

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी 👇🏾⏺️ शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत.⏺️ ⁠काढणी केलेली #पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत.⏺️ ⁠वादळी वारे, #पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.⏺️ ⁠#शेतमाल, #भाजीपाला व इतर काढणी केलेली उत्पादने उघड्यावर ठेवू नयेत.

00000

संबंधित पोस्ट

पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन* अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत…

vishwatmaklokswamivarta

वयाच्या चौथ्या वर्षी साहित्याच्या निर्मितीला सुरूवात करुन अजूनही वयाच्या ९३ व्या वर्षी सर्व प्रकारचे साहित्य निर्माण केलेल्या सृजनशील साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना या संमेलनाचा पहिला साहित्यभूषण पुरस्कार देताना आनंद होत आहे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या

vishwatmaklokswamivarta

पाल’ देवस्थानला पर्यटन स्थळासाठी प्रस्ताव सादर करावा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

येत्या रविवारी ‘वैभव – विशाल’ गझल संध्या कार्यक्रम पत्रकार संघांतर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळाचे आयोजन 

कायद्याची जाण निर्माण करण्यासाठी,सामाजिक न्यायासाठी महाशिबिर उपयुक्त ठरेल- न्यायमूर्ती भारती डांगरे ,इस्लामपूरमध्ये विधी साक्षरता, शासकीय योजनांचे महाशिबिर उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

प्रशासनिक विभागांनी शासकीय कार्यालयांची  जनमाणसात सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा आढावा बैठकीत दिले निर्देश