vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ डिसेंबर २०२६ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची निवडयादी व गुणयादी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mecenmms.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (एनएमएमएस) विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांची यादी २४ फेब्रुवारी रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना, पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व जन्म दिनांक आदी बाबतची दुरुस्ती असल्यास परिषदेकडे ऑनलाईन पाठविणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी, पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे

या परीक्षेसाठी २ लाख ५० हजार ७४५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११ हजार ६८२ शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते, तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे ७ वी व ८ वीची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे

परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (योजना) व शिक्षण संचालक (योजना) यांच्यामार्फत केले जाते, असे आयुक्त महेश चौथे यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषिमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथम..

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्यविद्यापीठात-‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ स्थापन करण्यात येणार-राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचे प्रकाशन

मराठवाड्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या निवास्थानाचा स्मारकापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासास दिल्ली येथे* *होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिलेला उजाळा**गोष्‍ट बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाची….*

vishwatmaklokswamivarta