vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील सुमारे ७ किलोमीटर नाल्याचे आणि तांबरवाडी, राजेवाडी येथील सुमारे ६ किलोमीटर नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाची प्रत्यक्ष पहाणी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील सुमारे ७ किलोमीटर नाल्याचे आणि तांबरवाडी, राजेवाडी येथील सुमारे ६ किलोमीटर नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाची दखल

राज्य प्रतिनिधी – लातूर येथे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील सुमारे ७ किलोमीटर नाल्याचे आणि तांबरवाडी, राजेवाडी येथील सुमारे ६ किलोमीटर नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाची प्रत्यक्ष पाणी केली. तसेच दावतपूर येथे अभिसरणातून उभारण्यात आलेली अंगणवाडी इमारत, कांदाचाळ, जनावरांचा गोठा यासह विविध विकास कामांची पाहणी केली. तसेच याठिकाणी नाला खोलीकरण कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. येथील अमृत तलाव संवर्धन कामाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, ग्रामस्थांशीही संवाद साधला

पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरण्यासाठी राज्य शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत औसा तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार दिनकर माने, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, औसा पंचायत समिती सभापती गंगाबाई कोदळीकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रशेखर सोनवणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परीक्षित पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

****

संबंधित पोस्ट

सार्वजनिक उत्सवांमध्ये स्वच्छता, आणि अन्न सुरक्षा यास विशेष लक्ष द्यावे – अन्नऔषध प्रशासन विभागाचे आवाहन

महिला सक्षमीकरणासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्नशील रहावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

लातूर जिल्हा-लातूर जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस सुरू असून खालील मार्गावर पुलावर पाणी आल्याने सदर मार्गावरील एस. टी.बस वाहतूक बंद विविध ठिकाणी पावसामुळे बंद असल्याने नागरिकांच्या माहितीकरिता

जालना जिल्ह्यातील संत निरंकारी भाविक सत्संगाकरिता दिल्लीस रवाना

vishwatmaklokswamivarta

नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील जैविक इंडियन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta