जालना, प्रतिनिधी- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार, जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, दि. 9 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या प्रलंबित वादांत तडजोड करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा मोहिते यांनी केले आहे.
दिवाणी व फौजदारी: सर्व दिवाणी आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे., कौटुंबिक वाद: कौटुंबिक न्यायालयातील वैवाहिक व इतर वाद, अपघात व वीज देयके: मोटार अपघात नुकसान भरपाई आणि वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे, बँक व थकीत देयके: बँकांची येणेबाकी आणि दाखलपूर्व प्रकरणे. इतर न्यायालये: औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणे आदि प्रकरणे लोकअदालतीत मिटवता येतील. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.