vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य प्रतिनिधी -राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी लहान वयातच जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलं आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ट्रॅफिक गार्डन उभारण्यात येणार असून ते सुमारे एक एकर क्षेत्रात विकसित केले जाणार आहे. प्रत्येक उद्यानासाठी अंदाजे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या गार्डन्समध्ये लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक आणि छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत.

ही उद्याने विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असतील. वाहन परवाना प्रशिक्षणासाठी ट्रायल ट्रॅकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून शाळांना वेळेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

उद्यानांमध्ये दुर्मिळ वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जाणार आहे. तसेच भविष्यामध्ये ई-वाहनांच्या प्रतिकृती आणि माहिती नागरिकांना पाहता येणार आहे. वाहतूक शिस्तीसोबतच पर्यावरण जनजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं.

00000

संबंधित पोस्ट

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

केरोसीनचे टँकर प्राप्त झाले आहे. गोदाम व्यवस्थापकाच्या उपस्थितीत 12 हजार लिटर केरोसीन 124 परवानाधारकास वितरित

आदिवासी आश्रमशाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी  आज शहापूरमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’ चा किनगाव येथे राज्यस्तरीय शुभारंभ-१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती