vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य प्रतिनिधी -राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी लहान वयातच जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलं आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ट्रॅफिक गार्डन उभारण्यात येणार असून ते सुमारे एक एकर क्षेत्रात विकसित केले जाणार आहे. प्रत्येक उद्यानासाठी अंदाजे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या गार्डन्समध्ये लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक आणि छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत.

ही उद्याने विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असतील. वाहन परवाना प्रशिक्षणासाठी ट्रायल ट्रॅकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून शाळांना वेळेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

उद्यानांमध्ये दुर्मिळ वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जाणार आहे. तसेच भविष्यामध्ये ई-वाहनांच्या प्रतिकृती आणि माहिती नागरिकांना पाहता येणार आहे. वाहतूक शिस्तीसोबतच पर्यावरण जनजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा वार्षिक योजना सन 2025-2026 अंतर्गत प्राप्त निधी वेळेत खर्च करावा: पालकमंत्री पंकजा मुंडे· जिल्हा वार्षिक योजना सन 2025-2026 करीता 514.96 कोटींचा निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ऑलिंपिक दिनाचे आयोजन

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई नागपूर येथे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ; ग्रंथालयाचे भूमिपूजन

ओबीसीचा समाजावरील अन्याय विरोधात खेड तहसिल कार्यालयावर 15 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा मराठा- कुणबी एक नाहीत, शासन निर्णय रद्द करा !

vishwatmaklokswamivarta

विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल – नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन 

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबीराचा शुभारंभ…