vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

बुलढाणा, प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील किमान दहा वर्षे वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी राज्य शासनाने बीजभांडवल योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत भाजी स्टॉल, चहा-स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स-लॅमिनेशन सेंटर, फ्रुट स्टॉल, पिठाची गिरणी, कापडी पिशव्या तयार करणे, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी शॉप, मालवाहतूक टेम्पो, आईसक्रिम फॅक्टरी, वडा-पाव व ज्युस सेंटर, बेकरी व्यवसाय, बांगडी दुकान, बटाटा वेफर्स निर्मिती, ब्युटी पार्लर, सलून, चिकन-मासे विक्री केंद्र, मोबाईल शॉपी, मसाले तयार करणे तसेच लाँड्री व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना प्लंबर, फ्रिज दुरुस्ती, इलेक्ट्रिशियन, टीव्ही दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, स्मार्ट खेळणी तयार करणे, ए.सी. दुरुस्ती, गॅस शेगडी दुरुस्ती, घरगुती उपकरणे दुरुस्ती, वॉटर हिटर, गिझर व वॉटर फिल्टर दुरुस्ती यांसाठी आवश्यक साधनसंच खरेदीकरिता देखील कर्ज उपलब्ध होणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक तृतीयपंथीय व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, बुलढाणा येथे अर्ज प्राप्त करून तो दि. ३० मे २०२६ पर्यंत सादर करावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नागपूर जिल्ह्यातील #राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इतर मागास संवर्गातील समूहांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ‘महाज्योती’चा कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

भगवानगड विकासासाठी वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार

छठपूजा सणानिमित्ताने संभाव्य गर्दीच्या नियोजनासाठी भारतीय रेल्वे पुढील 5 दिवसांमध्ये 1,500 विशेष गाड्या चालवणार; प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास केंद्रस्थानी असणार

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गततीन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडुंनी देशाचे नाव उंचावावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन

vishwatmaklokswamivarta