vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

बुलढाणा, प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील किमान दहा वर्षे वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी राज्य शासनाने बीजभांडवल योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत भाजी स्टॉल, चहा-स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स-लॅमिनेशन सेंटर, फ्रुट स्टॉल, पिठाची गिरणी, कापडी पिशव्या तयार करणे, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी शॉप, मालवाहतूक टेम्पो, आईसक्रिम फॅक्टरी, वडा-पाव व ज्युस सेंटर, बेकरी व्यवसाय, बांगडी दुकान, बटाटा वेफर्स निर्मिती, ब्युटी पार्लर, सलून, चिकन-मासे विक्री केंद्र, मोबाईल शॉपी, मसाले तयार करणे तसेच लाँड्री व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना प्लंबर, फ्रिज दुरुस्ती, इलेक्ट्रिशियन, टीव्ही दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, स्मार्ट खेळणी तयार करणे, ए.सी. दुरुस्ती, गॅस शेगडी दुरुस्ती, घरगुती उपकरणे दुरुस्ती, वॉटर हिटर, गिझर व वॉटर फिल्टर दुरुस्ती यांसाठी आवश्यक साधनसंच खरेदीकरिता देखील कर्ज उपलब्ध होणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक तृतीयपंथीय व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, बुलढाणा येथे अर्ज प्राप्त करून तो दि. ३० मे २०२६ पर्यंत सादर करावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कालावधीत वाढ..

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंध) अधिनियम; अत्याचारात मृत्यू झालेल्या वारसांना नोकरी• जिल्ह्यात 18 प्रकरणांचा समावेश • पात्र वारसांना दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शेती स्वालंबन मिशनच्या अध्यक्षांची पोहरापुर्णा येथे सांत्वनपर भेट

vishwatmaklokswamivarta

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त

ज्या महाराष्ट्रात थोडा जरी आरोप झाला तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाvजायचा आज त्याच महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही राजीनामा घेतला जात नाही ही सत्ताधार्‍यांची हतबलता :-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन डेहराडून, बडोदा, दिल्ली, बेळगाव, गोवा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव

vishwatmaklokswamivarta