vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गुरुवारी ठाण्यातील काही भागात 24 तास पाणी नाही

गुरुवारी ठाण्यातील काही भागात 24 तास पाणी नाही

ठाणे प्रतिनिधी : दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी जलसंपदा विभागासमवेत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार सद्यस्थ‍ितीत आंध्रा व बारवी धरणातील पाण्याची तूट तसेच पुढील हंगामात पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी वापराचे नियोजन करण्यासाठी महामंडळामार्फत पाणी कपात करण्याचे प्रस्तावित आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरूत्ववाहिनी क्र. 1,2 व 3 वर वाहिन्यांचे उन्‍नतीकरण व तातडीचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी गुरूवार दिनांक 21/05/2026 रोजी दुपारी 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक 22/05/2026 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा -मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभागसमिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहेतरी सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार उद‌्घाटन- मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

आमदार विक्रम काळे यांना ‘मराठवाडा आयकॉन’ पुरस्कार

मुंबई सह उपनगरात जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात

कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान या विषयावर मुंबई येथे विशेष संवाद !वर्ष ७११ पासून सुरु असलेल्या जिहादच्या षडयंत्राविषयी हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी जनजागृती अभियान !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा  –जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

नूतन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी कार्यभार स्वीकारला