vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

२५ वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता १.५ कि.मी.पर्यंत खुला

२५ वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता १.५ कि.मी.पर्यंत खुला

 

नांदेड, प्रतिनिधी: नांदेड तालुक्यातील सुगाव बुद्रुक, सुगाव खुर्द ते भानपूर या मार्गावरील शिवरस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाले होते. संबंधित शेतकऱ्यांना रस्त्याचे महत्त्व समजावून सांगून त्यांच्या सहमतीने आज 22 मे 2026 रोजी सुमारे १.५ कि.मी. लांबीचा रस्ता खुला करण्यात आला.मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यात शिवरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

या कारवाईवेळी नायब तहसीलदार (महसूल) सुनिल माचेवाड, मंडळ अधिकारी नाळेश्वर, कुणाल जगताप, तलाठी सज्जा वाघी राजेश बरोडा तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी उपस्थित होते.यापुढेही अशाच प्रकारचे शिवरस्ते खुले करण्यात येणार असल्याचे तहसीलदार संजय वारकड यांनी सांगितले. तसेच रस्ते अडविणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे शासकीय लाभांपासून वंचित ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिलापावसाळ्यात शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना चिखलातून जावे लागत होते. आता रस्ता मोकळा झाल्याने शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला.

यावेळी दत्ता भोसले, बाबुराव शिंदे, नामदेव शिंदे, दत्तराव तातेराव भोसले, विजय भोसले, गंगाधर भोसले, संतोष भोसले, जळबाजी भोसले आदी शेतकरी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट-गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी इत्यादींबाबत सकारात्मक चर्चा…

कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील १ हजारहून अधिक युवतींचा सहभाग-कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार ! 

vishwatmaklokswamivarta

आयडिएशन कॉम्पिटिशन ३.०’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

नवी मुंबई महानगरपालिकेचा 6704.43 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महासभेत सादर-स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील यांनी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्याकडे सादर केला अर्थसंकल्प…

मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट 2047 मध्ये सर्वसमावेशकता असावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,वातावरण बदलामुळे होणाऱ्या परिणामांवर  उपाययोजनांचा प्रामुख्याने समावेश असावा

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील*