vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वसतिगृहांसाठी सैनिकांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू

वसतिगृहांसाठी सैनिकांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू

​अहिल्यानगर, द प्रतिनिधी : जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा व कोपरगाव येथील सैनिकांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, दि. ३० जून २०२६ पर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे.

​अहिल्यानगर येथे सैनिक मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह नगर कॉलेजसमोर स्थित असून, श्रीगोंदा येथे शासकीय आरोग्य केंद्राशेजारी सैनिक मुलांचे वसतिगृह कार्यरत आहे. तसेच कोपरगाव येथे खंडोबा मंदिराशेजारी सैनिक मुलांचे वसतिगृह सुरू आहेया वसतिगृहांमध्ये अंघोळीसाठी गरम पाणी, स्वतंत्र अभ्यासिका, विविध खेळांचे साहित्य तसेच सुसज्ज मैदान उपलब्ध आहे. वेळोवेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात येते. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहांच्या अधीक्षकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे​या वसतिगृहांमध्ये इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण तसेच औद्योगिक प्रशिक्षण व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिक व सेवेत असलेल्या सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाणार आहे. युद्धविधवा तसेच दिव्यांग सैनिकांच्या पाल्यांना विनामूल्य प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे

अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी दि. ०१ जुलै २०२६ रोजी प्रवेश निश्चितीसाठी उपस्थित राहावे, असेही कळविण्यात आले आहे.#सैनिकपाल्य #SainikHostel2026 #अहिल्यानगर #Ahilyanagar #वसतिगृहप्रवेश #HostelAdmission #माजीसैनिक

संबंधित पोस्ट

ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी आगाऊ बुकींग करू नयेजिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन*घरपोच सेवा देण्यासाठी यंत्रणा राबविणार

छठपूजा सणानिमित्ताने संभाव्य गर्दीच्या नियोजनासाठी भारतीय रेल्वे पुढील 5 दिवसांमध्ये 1,500 विशेष गाड्या चालवणार; प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास केंद्रस्थानी असणार

vishwatmaklokswamivarta

भोकरदनमध्ये शिवसेनेचा शक्तीप्रदर्शनात्मक समर्थन कार्यक्रम संजय राऊतांवरील आरोपांमागे राजकीय सूडभावना –खासदार राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी

शेतीसाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांतील शासकीय ठेवी काढून घ्या- जिल्हाधिकारी संतोष पाटील  

धारावी झेंडा ग्रुप तर्फे 134 लाडू वाटून डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न.

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार*