vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत;३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत…

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत;३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी दि.२१, २२ व २३ ऑगस्ट रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी आपली सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी दि.३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतीचा उद्देश सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारीत निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. त्यासाठी पक्षकार, वकील ह्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. https://forms.gle/iqxefqF4BCWzukoP6 या गुगल लिंकवर अर्ज भरता येणार आहे. तसेच https://www.sci.gov.in या संकेतस्थळावरुनही अर्ज भरता येणार आहे. या लोकअदालतीत पक्षकारांना आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याची सुविधा देण्यात आली आहे. दि.३१ मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. या विशेष लोकअदालतीत सहभाग घेण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्हा महिला, बाल विकास सनियंत्रण समिती बैठकबालकामगार ,बालभिक्षेकरी व शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या,नागरिकांचे पीआर कार्ड व रेल्वेच्या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक,स्टेडियम उभारून रेल्वे स्टेशनपासून ग्लोबल शाळेकडे जाणार्‍या,रस्त्यासंदर्भात सत्ताधार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर 

डाक विभागाच्या” ज्ञान पोस्ट” सेवेला 1 मे पासुन सुरुवात..

शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न परिपाठ ते गृहपाठ पर्यंत विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाची संधी द्या. – जिल्हाधिकारी- डॉ. किरण पाटील 

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्याने- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर-– जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta