vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

लातूर जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

 

लातूर, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि जळकोट तालुक्यांमध्ये प्रत्येकी मुलांचे एक व मुलींचे एक अशी एकूण चार शासकीय वसतिगृहे कार्यरत असून या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवर्गनिहाय अर्ज करावे लागणार आहेत

या प्रवेश प्रक्रियेत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी ९० टक्के, ऊसतोड कामगारांचे पाल्य असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के, ऊसतोड कामगार असलेल्या विधवा, परित्यक्ता व एकल पालक यांच्या पाल्यांकरिता ३ टक्के, तर ज्यांचे मृत्यू झालेले पालक ऊसतोड कामगार होते अशा अनाथ पाल्यांसाठी २ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी ३० जून २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक असून त्यांची प्रवेश प्रक्रिया ७ जुलै २०२६ रोजी अंतिम केली जाईल, तर इयत्ता ११ वी, १२ वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी १५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करावयाचे असून त्यांची प्रवेश प्रक्रिया ३१ जुलै २०२६ रोजी अंतिम करण्यात येणार आहे.

या वसतिगृहांमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत शैक्षणिक साहित्य, स्टेशनरी, एका वेळेचा सकस नाश्ता आणि दोन वेळचे चविष्ट भोजन यासह विविध शैक्षणिक सोयी-सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक ऊसतोड कामगारांच्या पाल्यांनी त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहांचे गृहपाल तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, लातूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूर येथील समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.

****

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन उत्साहात संपन्न

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

vishwatmaklokswamivarta

कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी-पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी – चिंचवड महानगरपालिका हरित कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग कार्यक्रम

बोले तैसा चाले…!अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा१३३ कोटींच्या भव्य स्मारकास मंजुरी; डॉ. संजय लाखेपाटील यांच्या पाठपुराव्याला यश..

राज्य शासनाची भूमिका -. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात बैठक

बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल…

vishwatmaklokswamivarta