vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक २१ जून २०२६रोजी ‘नीट’ (NEET) परीक्षा आयोजित करण्यात आली असून, ती सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यांनी सज्जता पूर्ण केली आहे. जिल्ह्यात एकूण ५० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा संपन्न होणार असून, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे सर्व नियुक्त अधिकारी यांनी समन्वयाने, जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडावे असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नीट परीक्षेच्या आयोजनासंदर्भात समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी . जी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत परीक्षेचे नियोजन आणि सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 जिल्ह्यात ५० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून यात शहरात ४७ आणि ग्रामीण भागातील तीन परीक्षा केंद्र असणार आहे.जिल्ह्यातील १७ हजार ७३४ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. दुपारी २:०० ते ५.१५ वाजता होणार आहे.प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र केंद्र निरीक्षक, पोलीस बंदोबस्त अधिकारी आणि परीक्षा कार्यरत दंडाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.परीक्षा केंद्राच्या परिसरात सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून ड्रोनद्वारे निरीक्षण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅन्ड येथे महानगर पालिकेच्या विशेष बस ची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्याग व्यक्ती साठी परीक्षा केंद्रावर मदत आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 परीक्षा केंद्राच्या बाहेर विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने तपासणी आणि उपस्थिती घेतली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहणे गरजेचे आहे. परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांनी प्रवेशपत्रावर (Hall Ticket) दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व नियुक्त अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला आपापसात समन्वय ठेवून परीक्षा शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

या बैठकीला पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रकाश जाधव, पोलीस उपायुक्त श्री. रत्नाकर नवले, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, नोडल अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, संतोष गोरड, विजय चव्हाण, प्रवीण फुलारी, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्यासह महावितरण विभाग आणि परीक्षा समन्वयक उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

केदारनाथहून गुप्तकाशीकडे जाणारं हेलिकॉप्टर आज सकाळी सुमारे ५:२० वाजता गौरीकुंडजवळ कोसळले.हेलिकॉप्टरमध्ये ६ प्रवासी (५ प्रौढ, १ बालक) व पायलट होते. हे प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात येथील होते.

vishwatmaklokswamivarta

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ प्रशासकीय यंत्रणांनी अतिरिक्त मनुष्यबळासाठी आवश्यक सेवा-सुविधाचा आराखडा 15 जानेवारीपर्यंत सादर करावा – आयुक्त शेखर सिंह

झुरळाच्या ( CJP ) राष्ट्र विरोधी आंदोलना विरोधात रत्नागिरीत सर्व सामान्य नागरीक रस्त्यावर उतरले!कोकणातून सुरु

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

आरफळ कालवा उन्हाळी आवर्तनास 15 मे पर्यंत मुदतवाढपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतल्याने लाभधारकांना दिलासा..

सावकारी जाचाने पीडित कर्जदारानी योग्य त्या पूराव्यानिशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे

vishwatmaklokswamivarta