vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा ‘हिमांशू रॉय लिगसी’ पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘हिमांशू रॉय लिगसी अवॉर्ड्स’वितरण कार्यक्रम

राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा ‘हिमांशू रॉय लिगसी’ पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘हिमांशू रॉय लिगसी अवॉर्ड्स’वितरण कार्यक्रम

मुंबई, प्रतिनिधी: पोलीस दलामध्ये कार्यरत असताना हिमांशू रॉय यांनी राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात केलेले कार्य सर्वपरिचित आहे. हिमांशू रॉय फाउंडेशनच्या वतीने संशोधित केलेले कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळातील निदानासाठी ‘हिमांशू रॉय कॅन्सर डिटेक्शन किट‘ कर्करोगातील उपचाराकरिता निश्चितच महत्त्वाचे ठरत आहे. हे कार्य त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या ‘हिमांशू रॉय लिगसी‘ पुरस्कारामुळे समाजाच्या सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरवच होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित ‘द हिमांशू रॉय लिगसी पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हिमांशू राय फाउंडेशनच्या संस्थापक भावना रॉय उपस्थित होत्या

हिमांशू रॉय यांच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिमांशू रॉय यांनी कर्करोगाशी लढा दिला. मात्र तो अयशस्वी ठरला. मुंबईतील गुन्हेगारी मोडीत काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुंबईतील लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटाचा तपास आणि महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून त्यांनी केलेले कार्य राष्ट्र कधी विसरू शकणार नाही. प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपल्या कार्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

कर्करोगातील लवकर निदानासाठी प्रतिष्ठानने संशोधित केलेले किट कर्करोगातील उपचारांमध्ये वरदान ठरत आहे. हिमांशू रॉय प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रात 20 हजार लोकांना हिमांशू रॉय कर्करोग निदान कीटच्या माध्यमातून कर्करोगाच्या लवकर निदानासाठी लाभ मिळणार आहे. हे प्रशंसनीय कार्य असून यासाठी महाराष्ट्र शासनही प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य करेल. राज्य शासनाने कर्करोगाविरुद्ध लढाईसाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. लवकर निदान आणि माफक उपचार देण्याचे कार्य करण्यात येत आहे. या मोहिमेचाच भाग समजून प्रतिष्ठानच्या कार्याला जोडून घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गंधर्व संगीत महाविद्यालय आणि डॉ. अश्विनी भिडे – देशपांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वैद्यकीय क्षेत्रात डॉ. झरीर उदवाडिया आणि डॉ. शेखर भोजराज यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील पुरस्कार मरणोपरांत शहीद तुकाराम गोपाल ओंबळे यांना त्यांच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाब याला जिवंत पकडण्याच्या अतुलनीय कार्यासाठी देण्यात आला. त्यांची मुलगी वंदना ओंबळे – पटणी यांनी पुरस्कार स्वीकारला.

हिमांशू रॉय फाउंडेशनच्या रुग्ण सेवेत कार्यरत असलेल्या अमिताभ शहा, ऋषभ शहा यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मनोरंजन, वैद्यकीय, बांधकाम, प्रशासन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा सुधारित प्रस्ताव तयार करावापाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश…

जालना शहर महानगरपालिका मार्फत जालना शहरातील दिनांक 07 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी अकरा वाजेपर्यंत सार्वजनिक श्री गणेश मंडळाच्या 290 गणेश मूर्तींचे महापालिकेमार्फत श्री छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंड येथे विसर्जन

vishwatmaklokswamivarta

अहमदपूर येथे १५ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट* महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा समावेश* -रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांची माहिती* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त

ई-पिक पाहणीसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन…

खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागरी सत्कार· दिव्याचे देदीप्यमान यश देशातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल राज्य शासनातर्फे तीन कोटी रुपयांचे बक्षीस…