vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

सातारा प्रतिनिधी : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

खरीप पिके – भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल (एकूण ११ पिके) यांचा समावेश आहे. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु ३०० राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु १५० राहील स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क राहल. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, पाहिला मजला, एस.टी. स्टॅन्ड पाठीमागे, सातारा येथे संपर्क साधावा.

 

0000

संबंधित पोस्ट

जीडीसी अँड ए’ परीक्षा 23 ते 25 रोजी ; प्रवेशपत्रासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित

बुलढाणा नगरपरिषदेत पूजा संजय गायकवाड नगराध्यक्षपदी ; शिवसेनेची एकहाती सत्ता

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार पोर्टलसंबंधी प्रशिक्षणाचे आज आयोजन

गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णत: बंदी

जिल्हा सैनिक कार्यालय येथे अशासकीय पदभरती

vishwatmaklokswamivarta