vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

            सांगली, प्रतिनिधी: सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासनांतर्गत कार्यरत गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, मिरज येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन वसतिगृहाचे अधीक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, इयत्ता 11 वी, 12 वी तसेच प्रथम वर्षातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक (बी.एस्सी., बी.कॉम., बी.ए.) अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिक मागास, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अपंग व अनाथ विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/⁠ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.

            वसतिगृहात विनामूल्य प्रवेश, मोफत निवास व भोजन, स्टेशनरीसाठी 4 हजार रुपये, दरमहा 1 हजार रुपये निर्वाह भत्ता तसेच सहल व गणवेशासाठी 4 हजार रुपये अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी अधीक्षक, गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, रमा उद्यान, मेडिकल कॉलेज ग्राउंड शेजारी, मिरज येथे संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

शेतमजूर युनियन लालबावटा यांचा विधवा व निराधार महिला यांच्या मागण्या साठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन चा मोर्चा …

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ – उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार

vishwatmaklokswamivarta

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा  –जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

नीट युजी 2026 परीक्षा २१ जून रोजी पार पडणार असून, परीक्षा निष्पक्ष, सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात घेण्यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे.

प्रशासनाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा  –जिल्हाधिकारी किशन जावळे प्रशासन गाव की ओर सुशासन सप्ताह जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta