vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईच्या दादर येथे आज ५ जाने.राणी दुर्गावती ५०० वी व अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती वर्षानिमित्त ‘मानवंदना संचलनात, ३ हजार तरुणीचा सहभागी होणार…

मुंबईच्या दादर येथे आज ५ जाने.राणी दुर्गावती ५०० वी व अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती वर्षानिमित्त ‘मानवंदना संचलनात, ३ हजार तरुणीचा सहभागी होणार…

 

( सुरेश गायकवाड )

मुंबई प्रतिनिधी- विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मातृशक्ती दुर्गावाहिनी सातत्याने महिला भगिनींचे संघटन करून महिलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असते. राणी दुर्गावती यांनी मुघलांच्या विरोधात प्रखरतेने लढा देत गोंडवणा साम्राज्याचे रक्षण केले. अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा मुघलांनी उध्वस्त केलेल्या हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार, समाजातील सर्व ज्ञाती, पंथ, संप्रदायामध्ये सद्भाव राहण्यासाठी समाजकार्य, तसेच भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. राणी दुर्गावती यांचे ५०० वी जयंती वर्ष व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वी जयंती वर्ष निमित्त विश्व हिंदू परिषद मातृशक्ती , दुर्गावाहिनी यांच्या वतीने दि .५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत तब्बल ३ हजार महिला, तरुणींच्या उपस्थितीत संचलन पार पडणार आहे.

याशिवाय संध्या. ४.३० वा. राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे संचलन समारोप सभा पार पडेल. या सभेला परमपूज्य साध्वी ऋतंभरा दीदी माँ उपस्थितांना संबोधित करतील. तेव्हा जास्तीत जास्त महिला, भगिनींनी यांनी संचलनात व समारोप सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

 त्याचसोबत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दि. ५ जाने. पासून देशपातळीवर सरकारी नियंत्रणातून मंदिराच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियानाची सुरुवात विजयवाडा, आंध्रप्रदेश येथे भव्य सभेने होणार आहे. या जनजागृती सभेत तब्बल ५ लाख हिंदू समाज सहभागी होणार आहेत असे विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांत महिला दुर्गा वाहिनीच्या अध्यक्षा मनिषा भोईर, सचिव स्वाती भोसले आणि उपाध्यक्षा प्रिया सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधित पोस्ट

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी व्यापक उद्देश ठेवून ठोस अंमलबजावणीवर भर द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ला वेग

मराठवाडा विभागातील दलित आदीवासी भूमिहिन कास्तपट्टे नावेकरुन सातबारा उतार्‍याला नोंद घ्या – महसुलमंत्र्याकडे शिवसेना दलितआघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांची निवेदनाव्दारे मागणी..

नौदल माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी १९ जून रोजी लातूर येथे विशेष बैठक

राज्यात डाळींचा पुरेसा साठा उपलब्ध-अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

वर्षा अखेर दुर्दैवी घटना मोठी बातमी*भांडुप रेल्वे स्थानक जवळ स्टेशन बस डेपो जवळ बस खाली प्रवासी पादचारी चिरडले

vishwatmaklokswamivarta