vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

त्या’ बालकांच्या पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन

‘त्या’ बालकांच्या पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन

 

        बुलडाणा, प्रतिनिधी अभिषेक पडवळ या एक वर्षाच्या बालकाला त्यांच्या नातेवाईकांनी बाल कल्याण समितीकडे दि. 9 नोव्हेंबर रोजी सुपूर्त केले. तेव्हापासून बालकाला यशोधाम लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन बुलढाणा येथे ठेवण्यात आले असून बालकाच्या पालक व रक्तसंबधातील नातेवाईकांनी अद्यापर्यंत संपर्क साधला नाही. सदर बालकाच्या पुनर्वसनासाठी दत्तक विधान मुक्त करणे आवश्यक असल्याने बालकाच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांनी 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.

बालक नामे साई ऊर्फ अभिषेक पडवळ या बालकाला त्यांची काकू नामे वंदना हरसिंग पडवळ रा. नागझरी ता.खामगाव यांनी बाल कल्याण समितीकडे स्वाधीन केले होते. या बालकाला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार यशोधाम, दि लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. दाखल केल्यापासून या बालकाची विचारपूस, सांभाळण्यासाठी किंवा ताबा घेण्यासाठी कोणीही आलेले नाहीत. सदर बालकाचे पुनर्वसनासाठी दत्तक विधान मुक्त करणेकरिता विधी मुक्त करणे आवश्यक असल्याने बालकाचे कोणी रक्तसंबंधातील नातेवाईक असल्यास त्यांनी 30 दिवसाच्या आत यशोधाम दि लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड, खामगाव रोड, सेंट जोसेफ स्कुल जवळ, सुंदरखेड ता.जि.बुलढाणा या संस्था येथे किंवा सामाजिक कार्यकार्ता रामेश्वर जाधव यांच्या मोबाईल क्र. 9552206503 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000000

संबंधित पोस्ट

स्वच्छताकार्यासह मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस कृती आराखडयाचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी किशन जावळे

कर्नाटकमध्ये  पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण गंभीर जखमी 

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री अजित पवारांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळेबीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती बीडमधील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीकडूनचार हजार चौरस मीटर जागा व निधी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार 

महाड येथील दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर) न्यायालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ संपन्न,राज्य शासनाचे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास विशेष प्राधान्य — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे– मंत्री उदय सामंत