vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नाबार्डचा १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

नाबार्डचा १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-जिल्ह्याचा सन २०२५-२६ साठी १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा नाबार्ड मार्फत तयार करण्यात आला असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या आराखड्याचे विमोचन केले. जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश केदार आणि नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुरेश पटवेकर हे यावेळी उपस्थित होते.

या संदर्भत नाबार्डचे व्यवस्थापक सुरेश पटवेकर यांनी माहिती दिली की, कृषी पत, कृषी पायाभूत सुविधा आणि पूरक क्षेत्रविकास अशा तीन क्षेत्रांचे वर्गीकरण करुन पतआराखड्यात तरतूद करण्यात आली आहे. त्यात कृषी पत यात ४ हजार २६७ कोटी रुपये, त्यात प्राधान्याने शेतमाल उत्पादन, देखभाल व विपणन, कृषी कर्ज व संलग्न उपक्रमांचा समावेश आहे. कृषी पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी २३९ कोटी रुपयांची तरतूद असून इतर पूरक क्षेत्रविकास क्षेत्रासाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांस्ठी ८०१० कोटी रुपये, निर्यात कर्ज पुरवठ्यासाठी ३६ कोटी रुपये, शिक्षणासाठी ९९ कोटी रुपये, सामाजिक पायाभूत सुविधा ७८ कोटी रुपये, उर्जा नविनीकरणासाठी ६० कोटी रुपये, इतर ४३३ कोटी रुपये असा एकूण १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पत आराखडा तयार करण्यात आला आहे. गत वर्षी पत आराखडा १२ हजार ७६५ कोटी रुपयांचा होता, अशी माहिती सुरेश पटवेकर यांनी दिली.

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हा नियोजन समितीची

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते माणगाव येथे सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात 25 ते 27 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी-  विजेच्या कडकडाटासह 25 ते 27 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता-नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे

100 दिवस कृती कार्यक्रम व  योजनांचा आढावा जिल्हा परिषद ठाणे येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न ई-मालमत्ता, CSR पोर्टल व कर्मचारी ई-माहिती कोष प्रणाली पोर्टलचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचे कामकाज गतीमान होण्यास महत्त्वाचे  – मंत्री ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/ सैनिक विधवा यांना आवाहन…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्याऱ्या भारत गौरव पर्यटन रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून हिरवा झेंडा दाखवला.