vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जयभीमनगर प्रकरणी कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार- विशाल माने, अध्यक्ष युवा भीमसेना संघटना

जयभीमनगर प्रकरणी कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार- विशाल माने, अध्यक्ष युवा भीमसेना संघटना

 

( सुरेश गायकवाड )-मुंबई- पवईच्या जयभीम नगरातील हजारो लोकांच्या घरावर बेकायदेशीररित्या कारवाई करून त्यांना बेघर करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवर आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार असल्याचा इशारा युवा भीमसेना संघटनेचे अध्यक्ष विलास माने यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

   दि.६ जून २०२४ रोजी मनपाच्या एस विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने जयभीम नगरातील झोपड्यांवर कारवाई केली. ही कारवाई करण्यासाठी कुणाही विभागाचे आदेश देण्यात आले नव्हते तरी देखील मानवी हक्क आयोगाचे आदेश आहे असे भासवून येथील रहिवाशांना बेघर केले. त्यामुळे रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली असता कोर्टाने एसआयटी गठीत करून या समितीचे प्रमुख शशी कुमार मीना यांना संबंधित घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितला असता त्यांनी सदर घटनेचा अहवाल न्यायालयात सादर करून संबंधित घटनेसंबंधी महापालिकेकडे कारवाई करण्यासाठी कोणताही ठोस आदेश नव्हता असे अहवालात स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने एसआयटीला संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले तरी देखील एसआयटीने अद्यापही कारवाई केली नाही

त्यामुळे या अन्यायाविरोधात युवा भीमसेना आठवड्यात सरकारला घेराव घालणार असल्याचा इशारा देऊन एसआयटीला न्यायालयात खेचणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

थकीत कराच्या वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील-विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा वार्षिक योजना सन 2026 -2027 साठी 547.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता विकासकामांना गती, निधीचा प्रभावी वापर आणि वेळेत अंमलबजावणीवर भर

महाज्योती’च्या संशोधकाचा-‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन,माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध…

vishwatmaklokswamivarta

चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवरनियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा

कारागृहात निर्मित वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचालएकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी