vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

देशातील युवा परदेशात जातोय… हे थांबलं पाहिजे – सपा राज्य उपाध्यक्ष जोशी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने समाजवादी पक्षाची बैठक संपन्न

देशातील युवा परदेशात जातोय… हे थांबलं पाहिजे – सपा राज्य उपाध्यक्ष जोशी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने समाजवादी पक्षाची बैठक संपन्न

जालना । प्रतिनिधी – देशातील युवा हा परदेशात जात आहे. या युवकांना आपल्या देशात शिक्षण आणि रोजगाराबाबत साशंकता आहे. याचाच अर्थ त्यांना भारत देश हा चांगला नसल्याचे जाणवते, हे थांबलं पाहिजे, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष प्रभाकर जोशी यांनी येथे केले.

ते 488 विश्रामगृह येथे गुरुवार (दि 27) रोजी जिल्हा कार्यकारिणीची आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी राज्य सरचिटणीस डॉ. अब्दुल रऊफ, जिल्हाध्यक्ष शेख नबी सिपोराकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी जिल्हा कार्यकारिणीतील विविध पदाच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.

यावेळी पुढे बोलतांना श्री जोशी यांनी म्हटले आहे की, भारतातून परदेशात जाणारे युवकांची मानसिकता भारत हा देश चांगला नसल्याची आहे, येथे शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्‍न आहेत. त्याच बरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत चालला आहे. अशा वेळी अमेरिकेत गेल्यावर डॉलरच्या माध्यमातून चांगली कमाई करता येईल असे ध्येय बाळगून हे युवक त्या दिशेने जात आहेत. भारतातून जवळपास तीन कोटी युवक हे परदेशात आहेत. याला हे सरकार आणि शासन जबाबदार आहे. ही परिस्थिती बदलायला हवी. आणि त्यासाठी समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन देशात आणि राज्यात समाजवादी विचारांचे सरकार आणणे गरजेचे आहे. सध्या समाजवादी पक्ष देशात तिसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. पक्षाचे देशात 38 खासदार आहेत. याला नंबर वन वर घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगर पंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी सर्वस्व पणाला लावून निवडणुकीत उतरावे जास्तीत जास्त जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरावेत तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी एक होऊन प्रयत्न करावे असा सल्ला देखील त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला.

राज्य सरचिटणीस डॉ. अब्दुल रऊफ म्हणाले की, जालना जिल्ह्यात समाजवादी पक्षाची मोठी ताकद आहे. अशावेळी आठही तालुक्यासह जिल्ह्याभरातील नगर पंचायत, महानगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत स्वबळावर निवडणुक लढविण्याच्या दिशेने तयारी करावी. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. या ठिकाणी कोणत्या पक्षाची युती-आघाडी करायची याचा सर्वस्वी अधिकार येथील जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांना आहे. त्यांच्याकडुन आलेल्या शिफारशींचाच उमेदवार निवडतांना विचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, समाजवादी पक्षाच्या शिक्षक विंगमध्ये मराठवाडा विभागावर नागसेन बनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, मराठवाडा सदस्यपदी प्रभाकर दांडगे, तालुका कार्याध्यक्ष दिलशाद खान, शहराध्यक्ष दीपक शेळके, शहर उपाध्यक्ष सोफियान कुरैशी, सदस्यम्हणून लाला कुरैशी, जुबेर कुरैशी, शालीक दाभाडे, माणिक दाभाडे, म्हस्के, जाधव आदींची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा सचिव शेख मुजिबुद्दीन तर आभार परतूर शहराध्यक्ष श्री घनपटे यांनी मानले.

यावेळी समाजवादी पक्षाचे प्रो. साबेर, शेख जहिर, इम्रान खान, सलमान खान, शेख इद्रीस, लाला कुरैशी, अझरुद्दीन, अफरोज पठाण, नारायण पाटील, साहेबराव कडाळे, शेख अब्बास, शेख मोहसिन, शेख अकबर, इरफान बेग मिर्झा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,विज्ञान युगातही अंधश्रद्धेचा विळखा जनतेला फसवल्यास सात वर्षापर्यंत शिक्षा…

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्रपुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे- प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा उभारणार बिडकीन येथे शाळा..

खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १५ बोटी जिलेटिनद्वारे उध्वस्त,सिंदखेडराजा, बुलढाणा आणि जालन्यातील पथकाची संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

एफएसएसएआयने राज्यांना फळांवर कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याचे केले आवाहन.एफएसएसएआयने फळांच्या कृत्रिम पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर आणली बंदी..