vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत जाहीर आवाहन*

*नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत जाहीर आवाहन*

 

      नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाणी देयकाबाबत नागरिकांची दिशाभूल करणारा संदेश मोबाईल व्हॉटस-अप क्रमांकावरून प्रसारित होत आहे. नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांचा मोबाइल क्रमांक असल्याचे सांगत नागरिकांना ०९८३४२२५७६८ या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात येत आहे. या क्रमांकावर संपर्क करा अन्यथा तुमचा पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल असा संदेश दिला जात आहे. परंतू हा संदेश नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रसारित करण्यात आलेला नसून दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक हा नवी मुंबई महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांचा नाही. त्यामुळे या क्रमांकावर कोणीही संपर्क करु नये.

याव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, त्यांनी पाणी देयके ही नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय तसेच अधिकृत पाणी देयक भरणा केंद्र या ठिकाणीच भरणा करावीत. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट https://www.nmmc.gov.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन व पाणी देयकावरील QR कोडव्दारे पाणी देयके भरणा करावीत. तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.

0000000

संबंधित पोस्ट

मणदूर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सांगली जिल्हाधिकारी यांनी बैठक घ्यावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

आता खैर नाही खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश !  दिव्यांगांच्या डब्यात आरपीएफ जवान तैनात राहणार ..

मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार; पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती• बालशिवबासह जिजाऊ पुतळ्याच्या जागेची पाहणी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्यात पहिले विमान घेणार “टेक ऑफ”**जगातील सर्वात जलद “बॅग क्लेम” प्रणाली होणार कार्यान्वित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

.मुंबईत आज प्रतिपंढरपूर) वडाळा, येथे आषाढी एकादशीच्या पर्वकाळी श्री विठ्ठलाचा महाभिषेक सोहळा…

संतानी पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश दिला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप