vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्याची सय्यद अशफाक अली यांची मागणी

नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्याची सय्यद अशफाक अली यांची मागणी

 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्याची मागणी सय्यद अशफाक अली यांनी कामगार सहाय्यक उपआयुक्त विभागीय कार्यालय मालजीपुरा रेल्वे स्टेशन यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर माथाडी बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्यामार्फत सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य संच वाटप केले जातात. परंतु आपल्या कार्यालयामार्फत सदरील साहित्याचे वाटप मागील सहा महिन्यापासुन बंद आहे. तसेच अनेक माथाडी कामगारांचे नुतनीकरण देखील संपले आहे. आपल्या कार्यालयाच्या उदासिन धोरणामुळे अनेक माथाडी कामगार या योजनेपासून वंचित आहेत.

तरी लवकरात लवकर नोंदणीकृत मायाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्यात यावे. नसता आपल्या कार्यालयासमारे माथाडी कामगार प्रदेश प्रमुख मा. छगन पाटील व माथाडी कामगार प्रदेश उपाध्यक्ष हमद चाऊस तसेच माथाडी कामगार प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माथाडी कामगार प्रदेश सरचिटणीस सादीक इनामदार यांच्या निदर्शनाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठवाडा सरचिटणीस माथाडी कामगार विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सय्यद अशफाक अली व शेख अर्सलान यांनी दिला आहे.

संबंधित पोस्ट

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महानगर प्रदेशात महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी अभिनव प्रकल्पाचा प्रस्ताव-छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणास अर्बन रिसर्च फाउंडेशन–सेफटीपिन यांचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व्यक्तींना ई व्हेईकलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंतीचा उत्सव आजपासून बुलढाण्यात..प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांची यावर्षी रेलचेल!

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत ६ हजार ४६२ घरकुलांना मंजुरी जिल्ह्यात कातकरी कुटुंबांचे सर्व्हेक्षण युध्द पातळीवर सुरू१२ हजार २३७ घरकुलासाठी पात्र कातकरी कुटुंबियांना मिळेल पक्के घर…

राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची #मदत देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-