vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी ~ जातनिहाय जनगणना करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा क्रांतिकारक निर्णय आहे. जातनिहाय जनगणने च्या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात हा निर्णय घेण्याची हिंमत दाखवली नाही आता राहुल गांधींनी यावर टीका करू नये. सर्व जातींना न्याय देण्यासाठी ही जातनिहाय जनगणना उपयोगी ठरेल. या क्रांतिकारक निर्णय बद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करीत आहोत अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी जातनिहाय जनगणने च्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

भारतीय संविधानाच्या कलम 17 नुसार जातीभेद करणाऱ्या जाती संपवण्यात आल्या आहेत.मात्र तरीही समाजात जाती आहेत.प्रत्येक जातीची लोकसंख्या या जातिनिहाय जनगणने नुसार स्पष्ट होईल.कोणत्या जात घटकाला कोणत्या क्षेत्रात मागास आहेत.त्यांना कसली कमतरता आहे.त्याची पूर्तता करण्यास या जात

जनगणनेचा फायदा होईल.प्रत्येकाला न्याय देण्यासाठी देशात समाजात प्रत्येक जातीची सद्यस्थिती सत्य चित्र स्पष्ट होणे आवश्यक आहे.त्यासाठी ही जात जनगणना उपयोगी ठरेल.सामाजिक समता आणि सर्वांचा सर्वंकष विकास करण्यासाठी जात जनगणना महत्वाची ठरेल. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातनिहाय जनगणनाचा निर्णय हा त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.असे सांगत ना. रामदास आठवले यांनी जातनिहाय जनगणना च्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत आश्वासन…

नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मान्यता – मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

ग्रामपंचायत सावळी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी बसचालक संजय मोरे याचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला 

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय बाजार समित्यांचे सक्षमीकरण करताना शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे – उपमुख्यमंत्री अजित पवार

नगरपरिषद, नगरपंचायत शाळांतील शिक्षक – कर्मचारी पेन्शन योजनेपासून वंचित आमदार सुधाकर अडबाले यांचा विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे सवाल एक ते दीड महिन्यात सकारात्मक निर्णय : मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन..