vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर-आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास, आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर:-आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास, आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

 

राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर- आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास झाले आहेत. आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून आज (5 मे) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांचे बारावी बोर्ड परीक्षेचे गुण results.digilocker.gov.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स सोबतच अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वरही पाहता येणार आहेत. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आईचं नाव आणि रोल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर काही क्षणात तुमचा निकाल स्क्रिनवर दिसणार आहे. आज सकाळी बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा बारावी परीक्षेचा बोर्डाचा निकाल 91.88% लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा निकाल 1.49% कमी आहे. यंदाची मुलींनी बारावीच्या निकालामध्ये बाजी मारली आहे. सुमारे 5% अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. आज ऑनलाईन निकालानंतर उद्या पासून शाळा, कॉलेजात गुणपत्रिकांचे वाटप सुरू होणार आहे.

 कसा पहाल बारावीचा निकाल ऑनलाईन?बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.-होमपेजवर ‘महाराष्ट्र एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे नाव टाका.

सबमिट’ बटणावर क्लिक करा.यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.

 मोबाईल वर SMS द्वारा कसा पहाल?

SMS द्वारा निकाल पाहण्यासाठी MHHSC{SPACE} Seat Number तुम्हांला 57766 वर पाठवावा लागेल.आता तुम्ही ज्या नंबर वरून मेसेज पाठवला आहे त्या नंबर वर निकाल एसएमएस च्या माध्यमातून कळवला जाईल.पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजी नगर, लातूर या 9 विभागातून एकूण 14 लाख 27 हजार 85 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातून 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थी प्रविष्ट झाले. आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास झाले आहेत. आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे ४, ८, ९ व १० वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

शेतकऱ्यांनी विमा संरक्षित ई-पीक पाहणी करुन घ्यावी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार, गृह मंत्रालयाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरसाठी अतिवृष्टी, पूर, ढगफुटी आणि भूस्खलन यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथके स्थापन

लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

vishwatmaklokswamivarta

सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घेतली मंत्रालयात सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta