vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर-आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास, आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर:-आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास, आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

 

राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर- आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास झाले आहेत. आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून आज (5 मे) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांचे बारावी बोर्ड परीक्षेचे गुण results.digilocker.gov.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स सोबतच अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वरही पाहता येणार आहेत. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आईचं नाव आणि रोल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर काही क्षणात तुमचा निकाल स्क्रिनवर दिसणार आहे. आज सकाळी बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा बारावी परीक्षेचा बोर्डाचा निकाल 91.88% लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा निकाल 1.49% कमी आहे. यंदाची मुलींनी बारावीच्या निकालामध्ये बाजी मारली आहे. सुमारे 5% अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. आज ऑनलाईन निकालानंतर उद्या पासून शाळा, कॉलेजात गुणपत्रिकांचे वाटप सुरू होणार आहे.

 कसा पहाल बारावीचा निकाल ऑनलाईन?बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.-होमपेजवर ‘महाराष्ट्र एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे नाव टाका.

सबमिट’ बटणावर क्लिक करा.यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.

 मोबाईल वर SMS द्वारा कसा पहाल?

SMS द्वारा निकाल पाहण्यासाठी MHHSC{SPACE} Seat Number तुम्हांला 57766 वर पाठवावा लागेल.आता तुम्ही ज्या नंबर वरून मेसेज पाठवला आहे त्या नंबर वर निकाल एसएमएस च्या माध्यमातून कळवला जाईल.पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजी नगर, लातूर या 9 विभागातून एकूण 14 लाख 27 हजार 85 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातून 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थी प्रविष्ट झाले. आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास झाले आहेत. आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकअदालतीला उस्फुर्त प्रतिसाद 6 हजार 542 प्रकरणे निकाली…

सांगली पाटबंधारे विभागात पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

जम्मू कश्मीर येथील येथे झालेल्या हल्ल्याबाबत….

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विभागाच्या कामाचा आढावा

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन उत्साहात

vishwatmaklokswamivarta

देशभरात मकर संक्रांतीचं पर्व- देशासह महाराष्ट्रात कडाक्याची थंडीची शक्यता हवामान खात्याचा अंदाज…

vishwatmaklokswamivarta