vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मालवण बंदराचा सर्वांगीण विकास करणार – पालकमंत्री नितेश राणे

मालवण बंदराचा सर्वांगीण विकास करणार – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी : आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असून मालवण हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. मालवण बंदरामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाने वाहनतळ व टर्मिनल बिल्डींग बांधलेली आहे. या परिसरातील शासकीय जागेतील वाहनतळामध्ये उभारलेल्या स्टॉल धारकांना याच परिसरात स्टॉल उभारुन देण्यात येतील कोणीही विस्थापित होणार नाही. या परिसराचे सुशोभिकरण करताना मरीना प्रकल्प विकसित करणार असून मालवण बंदाराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या महाराष्ट्र सागरी मंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी आमदार दीपक केसकरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगळे, कार्यकारी अभियंता मनीष मेतकर, पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, श्री वराडकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या नियोजनाप्रमाणे स्टॉल धारकांना स्टॉल उभारुन देण्यात येणार आहेत. कोणीही विस्थापित होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. मालवण मध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. राजकोट परिसरात शिवसृष्टी देखील उभारण्यात येणार असल्याने मालवण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरणार आहे. मालवण बंदराच्या विकासासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने आराखडा बनवावा. मालवणच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
बैठकीनंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्टॉल धारकांशी संवाद साधला.

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे दि.08 ते 14 एप्रिल या कालावधीत आयोजन

आषाढी एकादशी यात्रा: पूर्वतयारी आढावा बैठक भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

तातडीच्या उपचारामुळे दीड वर्षाच्या अनुजला मिळाले जीवदान**स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे होतेय कौतुक*

विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा स्ट्राइड’ उपक्रमाचा शुभारंभ; ‘मित्र’ राज्याच्या विकासाला दिशा देणारी महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावारूपास येईल

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गत आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीन क्लस्टरचे काम पूर्ण, पाच क्लस्टरला मंजुरी- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta