vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

         नवी मुंबई प्रतिनिधी -आज 1 जुलै रोजीच्या राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नेरूळ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयास भेट देत, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांचेसह डॉक्टर्सना गुलाबपुष्प देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, उपआयुक्त डॉ.अजय गडदे, नेरूळ रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.उध्दव खिल्लारे आणि इतर डॉक्टर्सना सन्मानीत करण्यात आले.

 आपल्या देशातील डॉक्टरांच्या अथक सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचे कृतज्ञ स्मरण ठेवून 1991 पासून दरवर्षी 1 जुलै हा दिवस ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’ म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. 1 जुलै 1882 रोजी सुप्रसिध्द चिकित्सक आणि प.बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ.बिधानचंद्र रॉय यांचा जन्म झाला होता व त्यांचा मृत्यूही 1 जुलै रोजीच सन 1962 मध्ये झाला होता. त्यांचे या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन हा डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो.

    डॉक्टर हे समाजातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. आजारी व्यक्तींच्या केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही डॉक्टर मनापासून काम करतात. कोव्हीड काळात डॉक्टरांनी दाखवलेली समर्पण भावना आणि धैर्य लक्षणीय होते. डॉक्टरांच्या या अविरत जनहिताय कार्याची कृतज्ञता व्यक्त करीत महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयात डॉक्टरांना शुभेच्छा देण्यात आल्या.

    सर्वच रूग्णालयांमध्ये आज केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘स्वच्छता अपनाओ – बिमारी भगाओ’ या अभियानाचा प्रारंभ विविध उपक्रम राबवून उत्साहाने साजरा करण्यात आला.

संबंधित पोस्ट

कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याने काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा काढून सिन्दुर ऑपरेशनचा विजय साजरा*

मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती.

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत टीबी मुक्त भारत 100 दिवसांची विशेष माहिम

हरवलेल्या व्यक्तीचा शोध किशोर बेपत्ता : जयेश चौरसिया ८ फेब्रुवारीपासून बेपत्ता.

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये माजी सैनिक व महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळावा