vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यभरातील शहरी व ग्रामीण भागांतील हजारो हॉटेल व्यावसायिकांचा कर वाढीविरोधात संप…

राज्यभरातील शहरी व ग्रामीण भागांतील हजारो हॉटेल व्यावसायिकांचा कर वाढीविरोधात संप…

राज्य प्रतिनिधी-

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कर आणि विविध शुल्कांमध्ये वाढ केली आहे. या वाढीचा तीव्र निषेध म्हणून राज्यभरातील हॉटेल व्यावसायिकांनी आज चौदा जुलै रोजी एकदिवसीय ‘हॉटेल बंद’ आंदोलन पुकारले आहे. या दिवशी हॉटेल, खानावळी, रेस्टॉरंट्स, टिफिन सेवा आणि होम डिलिव्हरी बंद राहणार असल्याचे संघटनांनी जाहीर केले आहे.

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, महाराष्ट्र हॉटेल असोसिएशन आणि स्थानिक संघटनांनी एकत्र येत हा बंद पुकारला आहे. त्यांचा आरोप आहे की शासनाने कर, वीजदर, पाणीपट्टी, परवाना शुल्क आणि इतर सेवा शुल्कात मोठी वाढ केली असून, त्यामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. विशेषतः छोटे आणि मध्यम हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.संघटनांनी सांगितले की, वारंवार चर्चा करूनही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी हा बंद शांततेत पुकारण्यात येत आहे. हा बंद नागरिकांना त्रास देण्यासाठी नसून, हक्काच्या मागण्यांसाठी आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आज राज्यभरातील शहरी व ग्रामीण भागांतील हजारो हॉटेल्स आणि खानावळी बंद राहतील. त्यामुळे नागरिकांनी त्या दिवशीची भोजन व्यवस्था पूर्वनियोजनाने करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. काही पर्यटन स्थळांवरील खाद्यसेवांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे

.000000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम तयारीचा,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा..

4 सप्टेंबरला पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

एटापल्ली तालुक्यात उपजिविका विकास कार्यक्रमामुळे रोजगाराच्या संधी वाढणार*   – *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*     *एटापल्ली तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत उपजिविका विकास कार्यक्रम*

भाजपा जालना महानगरात “मन की बात” कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पंतप्रधान मोदीजींच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यकर्त्यांना नवचेतना – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे