vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हर घर तिरंगा’ मोहिमेत विविध उपक्रमांचे आयोजन

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत विविध उपक्रमांचे आयोजन

अमरावती, प्रतिनिधी): स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यात येणार आहे. यात तीन टप्प्यात विविध उपक्रमांचे आयोजन कारण्यात आले आहे. या मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पहिल्या टप्यात 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान शाळा, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी तिरंगा प्रेरित सजावट. हर घर तिरंगा 2025 या हॅशटॅगसह सोशल मीडीयावर फोटो शेअर करणे, तिरंगा रांगोळी स्पर्धा-कार्यशाळा, तिरंगा राखी बनवण्याच्या स्पर्धा, अंगणवाडी, शाळा, वृध्दाश्रम, मॉल्स यामध्ये तिरंगा विषयक प्रश्नमंजूषा, शाळांमध्ये जवानांसाठी पत्रलेखन उपक्रम, ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियान हे 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवून स्वच्छता व पाणी संजीवनीवर विशेष भर देण्यात येणार आहे. स्वयंसेवक कार्यक्रमात प्रचारकांनी घरोघरी तिरंगा पोचवणे व जनजागृती करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय तिरंगा महोत्सव, तिरंगा मेला व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, तिरंगा बाईक व सायकल रॅली, तिरंगा यात्रा व मानवी साखळ्या, तिरंगा विक्री स्थानिक उत्पादक व स्वयं सहायता गटांचा सहभाग, मिडीया व सोशल मिडीयात हॅशटॅगसह प्रसिद्धी-प्रचार, प्रत्येक घरात तिरंगा विकत घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घर, कार्यालय, वाहनावर तिंरगा फडकावणे, सेल्फी व फोटो harghartiranga.com वर अपलोड करणे, ध्वजारोहण समारंभ, कार्यक्रामाचे प्रसारण व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पुरवठा विभागाची बैठक-डिसेंबर अखेर अनुदान वितरण करा- जिल्हाधिकारी स्वामी-एपीएल शेतकऱ्यांना ३० डिसेंबर पर्यंत बॅंक खाते तपशिलासह आधार संलग्निकरण करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जगातील सर्वात मोठा १६ हजार मेगावॅटचा विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प;शेतकऱ्यांसाठी दिवसावीज पुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ..

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर CBI चा छापा, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप….

vishwatmaklokswamivarta

खालापूर रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी येथे सलग चौथ्या दिवशीही शोधकार्य सुरुच; 81 जण अद्यापही बेपत्ता, कुजल्याने मृतदेहांना दुर्गंधी

vishwatmaklokswamivarta

राज्यात आजपर्यंत 1 कोटी 63 लाख 60 हजार पीकविमा अर्ज दाखल,लाखो शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा,आज विमा भरण्याचा अखेरचा दिवस – कृषी मंत्री धनंजय मुंडे

कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार साजारा

vishwatmaklokswamivarta