vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा…

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा…

मुंबई, प्रतिनिधी : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. हा दिवस अनेक ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य संग्राम सैनिक, क्रांतिकारक आणि सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देतो.

महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्राने सामाजिक-आर्थिक विकासात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आपले राज्य उद्योग, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, शेती आणि संस्कृती क्षेत्रांत आघाडीवर आहे.

समृद्ध आणि सर्वसमावेशक अशा विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात महाराष्ट्र सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा मला विश्वास वाटतो. देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी एकजूट होऊया आणि स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचे आदर्श पुढील पिढ्यांसाठी कायम ठेवूया”, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

राज्यपालांचे झेंडावंदन पुणे येथेएकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन शुक्रवारी (दि. १५) सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी पुणे येथील विधान भवनाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावुन मानवंदना देणार आहेत.परंपरेनुसार स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांनी सायंकाळी राजभवन, पुणे येथे निमंत्रितांसाठी चहापानाचे देखील आयोजन केले आहे.

संबंधित पोस्ट

बकरी ईद – जनावरांच्या कत्तलीसाठी प्रतिबंधित बाबी   येत्या 7 जूनला बकरी ईद सण आहे. बकरी ईद सणासाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल, कुर्बानी करण्यात येत असते. या अनुषंगाने प्रतिबंधित बाबींची माहिती देणारा लेख…

इलेक्ट्रीक वाहन रॅलीतून केली जनजागृतीअर्थिक बचत व पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपारिकऊर्जा वापरास चालना द्यावी- अपारंपारिक ऊर्जा मंत्री सावे

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

vishwatmaklokswamivarta

शांतिनिकेतन नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश!आपला पाल्य स्वतःच्या पायावर उभा राहिला यापेक्षा पालकांना दुसरा आनंद नसतो – भास्करराव अंबेकर

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार — काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मुंबईत घोषणा.

vishwatmaklokswamivarta

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असून, तो उद्या ‘मोंथा’ चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागानुसार, हे चक्रीवादळ मंगळवारी संध्याकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता….

vishwatmaklokswamivarta