vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

मुंबई प्रतिनिधी-मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसामुळे नागरिकांना पोलिसांकडून मोठा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाचा तोच जोर सुरू आहे. यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. तसेच समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले असून किंग सर्कल, हार्बर मार्ग, सायन-कोंडली रेल्वे ट्रॅकजवळ पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विविध ठिकाणी वाहने पाण्यात अडकली असून काही ठिकाणी वाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत आणि काही ठिकाणी वाहतूक थांबलेली आहे.मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून सुद्धा नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत १००, ११२ किंवा १०३ या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, पोलिसांना देखील पूर्णपणे सतर्क राहण्याचे तसेच मदतीसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईसह राज्यभरातही पावसाचा तडाखा आला असून काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेतही अडथळे येत आहेत. त्यामुळे पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, विद्युत उपकरणांपासून दूर राहावे आणि कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, अशी सूचना देण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

राज्यात हवामान विभागाने वाशिम, अमरावती, यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर, , गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे आणि सातारा घाट या परिसराला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर, नागपूर, भंडारा, गोंदिया व नाशिक या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला.

जालना शहरात पाम सण्डे निमित्त प्रभात फेरी उत्साहात संपन्न

ठाणे जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारांसाठी मदत कक्ष संपर्क क्रमांक जाहीर jo

एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी;परिस्थितीचे भान राखणाऱ्या शिक्षकांचेशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून कौतुक

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भूमिका घेत त्यांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार