vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्ह्याचा जीडीपी २०२७-२८ पर्यंत तीन लाख कोटींवर नेण्याचा संकल्प – जिल्हाधिकारी किशन जावळे

जिल्ह्याचा जीडीपी २०२७-२८ पर्यंत तीन लाख कोटींवर नेण्याचा संकल्प – जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड प्रतिनिधी-सध्या जिल्ह्याचा जीडीपी एक लाख पाच हजार कोटी इतका आहे. २०२७-२८ पर्यंत तो १ लाख ८६ हजार कोटी होणार आहे.परंतु लघु उद्योग भारती आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तो २०२७-२८ पर्यंत ३ लाख कोटींवर नेण्याचा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केला. ‘उद्योग सुसंवाद २०२५’ कार्यक्रमाचे आयोजन वासुदेव बळवंत फडके सभागृह, पनवेल येथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पनवेल महानगरपालिका उपायुक्त वैभव विधाते, जयेश देढीया, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळया तसेच विविध एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष व लघुउद्योजक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की,उद्योग विभागाशी निगडित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व विभागांना सोबत घेऊन, चर्चा करून प्रशासन मार्ग काढत आहे. जिल्हा प्रशासन ‘उद्योग सेतू’ या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योजकांचे अडी अडचणी आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

 लघु उद्योग भारती हा लघुउद्योजक आणि शासन यामधील दुवा म्हणून काम करत असून ऊर्जेच्या प्रश्नावर त्यांनी यशस्वी मध्यस्थी केली आहे. तसेच इन्कम टॅक्स कलम ४३ एच मध्ये सुधारणा करण्यासाठीही त्यांचा मोलाचा वाटा आहे.

रायगड जिल्ह्यात मरीन क्षेत्राला भरपूर वाव असून कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस यांना शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले. “नवी मुंबई विमानतळ, दिघी बंदर, जीएनपीटी बंदर, प्रस्तावित रेवस-रेड्डी महामार्ग यामुळे कोकणात इन्फ्रास्ट्रक्चरचे जाळे निर्माण होणार असून त्याचा फायदा उद्योग क्षेत्राला नक्कीच होणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी उद्योजकांबरोबर संवाद साधला.

मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पनवेल महानगरपालिका उपायुक्त वैभव विधाते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळया यांनी मनोगत व्यक्त केले.

0000

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज २५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन.. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन नोंदणीला सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ.. जागतिक तणावाचा बाजारपेठेवर परिणाम; पाहा आजचे ताजे दर

vishwatmaklokswamivarta

दहावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास १७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मान पत्र देऊन कार्याचा गौरव करण्यात आलासंविधान हत्या दिवस-2025 कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीतील चित्रांचे प्रदर्शन महिनाभर खुले राहणार..

आताची मोठी बातमी :- काही वेळापूर्वी जम्मूवरील पाकचा मोठा हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडला! ♦️ड्रोन आणि ८ क्षेपणास्त्रांचा प्रयत्न अखनूर, सांबा परिसरात फसला. ब्लॅकआउटच्या पार्श्वभूमीवर भारताचं तडाखेबंद प्रत्युत्तर.