vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई उपनगर जिल्ह्यात अद्यावत क्रीडा संकुल विकसित करणारपालकमंत्री  एडवोकेट.आशिष शेलार

मुंबई उपनगर जिल्ह्यात अद्यावत क्रीडा संकुल विकसित करणारपालकमंत्री  एडवोकेट.आशिष शेलार

मुंबई प्रतिनिधी: आजच्या युगात अभ्यासासोबत खेळाचे महत्त्व आहे. शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत खेळाडूंना देण्यात येत आहे. याशिवाय मुंबई उपनगर जिल्ह्यात या वर्षांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाअंतर्गत एक अद्यावत क्रीडा संकुल विकसित करण्यात येत असून यामध्ये विविध प्रकारांच्या क्रीडा सुविधा उपलब्ध असतील असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री अड. आशिष शेलार यांनी सांगितले.

            महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागा अंतर्गत असणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर द्वारा मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाच्या निमित्त 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रम उत्तर भारतीय संस्था हॉल, बांद्रा पूर्व येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार होते. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ काटियार,एन स्वामी रंगास्वामी (समर ऑलिंपिक खेळाडू) आंतरराष्ट्रीय वेट लिफ्टिंग खेळाडू, श्री. विपुल घोष (द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित)उपस्थित होते.     पालकमंत्री अड. आशिष शेलार यांनी विविध क्रीडा क्षेत्रामध्ये प्रविण्य प्राप्त खेळाडूंचे मुंबई उपनगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढविल्याबद्दल विशेष आभार मानले.

या कार्यक्रमामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध खेळातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू, छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी अशा 11 पुरुष आणि महिला खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. तसेच पारंपरिक खेळाचा वारसा असलेल्या दहीहंडी खेळाच्या पथकांचे पार्ले स्पोर्ट्स या महिला गोविंदा पथक (सात थरांचा विश्व विक्रम) कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथक (दहा थरांचा विश्व विक्रम ) यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी योगा आणि दहीहंडी या खेळांची प्रत्यक्षिके सादर करण्यात आली.

   जिल्हयातील क्रीडा यशाबाबत आणि विविध उपक्रमबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. प्रस्तावना जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती रश्मी आंबेडकर यांनी केली. कार्यक्रमासाठी खेळाडू उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलयाने विशेष प्रयत्न केले.

 

000

संबंधित पोस्ट

जालना शहराच्या शांततेसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरील उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात या मागणीचे  निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी नांदेड सज्ज !१० लाख भाविकांची मांदियाळी – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta

शहापुरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न शेकडो नागरिकांना घरबसल्या मिळाला शासकीय योजनांचा लाभ…

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे –प्रधान सचिव श्रीकर परदेशी*‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज** वाहतूक, आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन*

टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्यादृष्टीने दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्‍यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य पैशाची मागणी केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा    – उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण