vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन

मुंबईत सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन…

 

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईत सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास प्रदूषण नियामक मंडळाने परवानगी दिली आहे. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनादरम्यान कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्याचा बंधनकारक निर्णय झाल्यानंतर भक्त आणि मंडळांनी पालिकेच्या धोरणावर टीका केली होती. यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्याची मागणी केली होती आणि आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे.

सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन बाणगंगा तलाव आणि गिरगाव चौपाटी येथे करण्यास परवानगी मिळाली आहे. या निर्णयाबद्दल समितीने प्रदूषण नियामक मंडळ आणि मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनावर लादलेली बंदी समाप्त केली आहे. परंतु, सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, असे निर्देश देखील दिले गेले होते. यामुळे पालिकेने कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. मात्र, लहान मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक स्रोतात करू द्यावे, अशी मागणी सतत होत होती.

शाडू मातीच्या पुरवठ्यामुळे मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा मुंबई महापालिकेने सुमारे एक हजार टन शाडू माती मूर्तिकारांना पुरवली आहे, ज्यामुळे पर्यावरणपूरक मूर्तींच्या निर्मितीत मदत झाली आहे.

संबंधित पोस्ट

शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध…

ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta

पुणे येथील‘खडकवासला जलाशय रक्षण’अभियान 23 व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी !निसर्गाचा ऱ्हास न होता त्याचे संरक्षण झाले पाहिजे ! – भीमराव अण्णा तापकीर, भाजप आमदार, खडकवासला मतदारसंघ

महसूल विभागाने सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्न करावेत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी