vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प,मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम…

मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प ,दक्षिण मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम…

राज्य प्रतिनिधी-मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दक्षिण मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे निर्यातदार, आयातदार आणि प्रोजेक्ट कार्गो चालकांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, जबल अली नाईनसाठी जाणारी महत्त्वाची अवजड मशिनरी वेळेत पोहोचू न शकल्यास दंड तसेच करार रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हीच स्थिती अनेक ट्रक आणि इतर वाहतुकीच्या साधनांची आहे. निर्यात आणि आयात माल, जो हजारो कोटी रुपयांचा आहे, तो सर्व अडकून पडला आहे. देशभरातील विविध प्रकल्पांसाठी लागणारी मालसामग्रीदेखील अडकल्याने महत्त्वपूर्ण योजना खोळंबल्या आहेत.

ट्रक रिकामे उभे आहेत, चालक नसल्यामुळे वाहनांची तपासणी घेतली जात आहे. त्यामुळे कंटेनरवर डिटेंशन चार्ज, डेमरेज, तसेच मोठ्या प्रमाणावर दंड लागत आहे. या परिस्थितीमुळे आर्थिक संकट आणि मानसिक तणाव वाढला आहे, असे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे माजी अध्यक्ष बल मलकीत सिंह यांनी सांगितले.

जर यावर लवकर उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्र व भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो. मालवाहतुकीच्या खेपा रद्द होत असल्यामुळे आणि व्यापारी करार निष्फळ ठरत असल्यामुळे मोठ्या नुकसानाचा धोका आहे, असेही बल मलकीत सिंह यांनी स्पष्ट केले. आंदोलनाचा अधिकार स्वीकारला असला, तरी जीवनावश्यक मालवाहतूक, निर्यात-आयात माल वाहतुकीस अडथळा येणे समाजहिताचे नाही. त्यामुळे राज्य सरकारने मालवाहतुकीकरिता विशेष सुरक्षा तसेच आपत्कालीन मार्ग मोकळा करावा, अशी मागणी बल मलकीत सिंह यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या पात्र उमेदवारांना माहिती सादर करण्यासाठी २१ मार्चपर्यंतची मुदत; गुणपडताळणीही उपलब्ध

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस•कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणीकांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन    

राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी- अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक परिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार

पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा शिखर समिती बैठक; १७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता

मिरज तालुक्यात शासकीय जमिनीवरील-निवासी अतिक्रमण नियमित करण्यासाठी विशेष मोहीम सुरू- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2026