vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकरीस्तरीय ई-पीक पाहणीस २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

शेतकरीस्तरीय ई-पीक पाहणीस २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 बुलढाणा, प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी, दुबार पेरणी आदी कारणांमुळे अनेक शेतकरी ई-पीक नोंदणी करू शकले नाहीत. अशा शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य संचालक, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांनी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीसाठी २० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.

 यापूर्वी खरीप हंगाम २०२५ करीता १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावरून मोबाईल अँपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु अतिवृष्टी व दुबार पेरणीसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले होते.

राज्यातील शेतकऱ्यांना पीक नोंदणीसाठी आणखी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढीचा कालावधी संपल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी २१ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहाय्यक स्तरावरून पूर्ण केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 ००००

संबंधित पोस्ट

वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची ग्वाही

कोकण विभागातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, मुंबई (उपनगर), पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

बिहार मधील दुर्दैवी घटना होम गार्डच्या परीक्षेदरम्यान तरुणी बेशुद्ध; रुग्णालयात नेत असताना अम्ब्युलन्समध्येच चौघांकडून सामूहिक बलात्कार

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्ह्यातील ११ गावांचा समावेश; १५ जून पासून जनजागृती

जालना येथे 27 मार्च रोजी  रोजगार मेळाव्याचे आयोजन

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· इंदू मिल येथील पुतळ्यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार

vishwatmaklokswamivarta