vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कमलादेवी कॉलेज आणि जेएसएस फाउंडेशनचा ‘प्रारंभ’ इव्हेंट संपन्न

कमलादेवी कॉलेज आणि जेएसएस फाउंडेशनचा ‘प्रारंभ’ इव्हेंट संपन्न

वरिष्ठ प्रतिनिधी, मुंबई-विठ्ठलवाडी येथील कमलादेवी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स तसेच जेएसएस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन इव्हेंट ‘प्रारंभ’ चा समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

समारोप समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अनीता पारदेशी (सिटी इंजिनियर, केडीएमसी) उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून भाजप प्रदेश प्रवक्ते अजय पाठक, जेएसएस फाउंडेशनचे चेअरमन जे. पी. तिवारी, कमलादेवी एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन सदानंद तिवारी, बृजेश दीक्षित, जेएसएस फाउंडेशनचे सचिव आणि वरिष्ठ पत्रकार शैलेश तिवारी उपस्थित होते.

अनीता पारदेशी यांनी जीवनातील संघर्षाचे महत्त्व अधोरेखित केले व सांगितले की अडचणी आपल्याला सक्षम बनवतात आणि यशाचा मार्ग दाखवतात. तर भाजप महाराष्ट्र प्रवक्ते अजय पाठक यांनी विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन करत कठोर परिश्रमाबरोबरच मोबाईलवर कमी वेळ घालवण्याचा सल्ला दिला. त्यांनी यश मिळवण्यासाठी हार्ड वर्कसोबत स्मार्ट वर्क चीही गरज असल्याचे स्पष्ट केले.

या स्पर्धेत अनेक विद्यार्थी विजयी ठरले. त्यामध्ये प्रतीक बचाव (साकेत कॉलेज), अंश गुप्ता (वेदांत कॉलेज), श्वेता प्रजापती (कमलादेवी कॉलेज), ऋतिका गुप्ता (कमलादेवी कॉलेज), निनाद पाठक (बिर्ला कॉलेज), आर्यन कानेकर (मॉडेल कॉलेज, डोंबिवली), आर्यन कुंभार (महाराणा प्रताप कॉलेज, कुर्ला) यांचा समावेश होता. फ्री हँड पेंटिंग, फ्लायर मेकिंग, अ‍ॅड मेकिंग, इको-फ्रेंडली रंगोली, बुद्धिबळ व कॅरम यांसारख्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता आणि बौद्धिक क्षमता प्रदर्शित केली.

या कार्यक्रमाला श्वेता पांडे (कोषाध्यक्ष, कमलादेवी एज्युकेशनल ट्रस्ट) तसेच डॉ. सिम्मी सिंह (प्राचार्य, कमलादेवी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स) मंचावर उपस्थित होत्या. डॉ. सिंह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ अभ्यास नव्हे तर कौशल्यांच्या आधारेच यश संपादन करता येते.

या कार्यक्रमाचे व्यवस्थापन अधीक्षक सचिन चौधरी यांनी केले तर मंच संचालन श्विनी राणे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी चेअरमन सदानंद तिवारी यांनी उपस्थितांचे आभार मानले

संबंधित पोस्ट

समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली.* मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

महसूल कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा-जिल्हाधिकारी आंचल गोयल

रस्ता सुरक्षा संदर्भात सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे..!मिशन मोडवर काम करावे  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई विमानतळ, मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन