vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका

अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका

लातूर, प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची आज दुपारी १२:५० वाजता प्रशासनाने सुखरूप सुटका केली. या कार्यात राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याशी संपर्क साधून बचाव पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले. स्वतः पावसात चिलखा येथे पोहोचून मा. पाटील यांनी मजूर सुखरूप बाहेर येईपर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले.

आज पहाटे ५ वाजेपासून अडकलेल्या मजुरांना प्रशासनाने यशस्वीपणे बाहेर काढले. या कार्यात उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, पोलीस निरीक्षक भुसनर यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

8 एप्रिल रोजी दुसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन ; कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी घेतली आढावा बैठक*

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पं.दिनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेण्याच्या योजनेस मुदतवाढ

रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी अभियान उपयुक्त – आदिती तटकरे यांचे आवाहन,मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त 28 शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

vishwatmaklokswamivarta