vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका

अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका

लातूर, प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची आज दुपारी १२:५० वाजता प्रशासनाने सुखरूप सुटका केली. या कार्यात राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याशी संपर्क साधून बचाव पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले. स्वतः पावसात चिलखा येथे पोहोचून मा. पाटील यांनी मजूर सुखरूप बाहेर येईपर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले.

आज पहाटे ५ वाजेपासून अडकलेल्या मजुरांना प्रशासनाने यशस्वीपणे बाहेर काढले. या कार्यात उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, पोलीस निरीक्षक भुसनर यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील लघु सिंचन योजनांची सातवी तसेच जलसाठ्याची दुसरी प्रगणना वेळेत पुर्ण करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव जिल्ह्यात वन्यजीव पर्यटन व पोलीस आधुनिकीकरणाला गती

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान;मूल्यसाखळी भागीदार होण्यासाठी इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविले..

दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/ सैनिक विधवा यांना आवाहन…

जालना तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta