vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा!इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा!इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

जालना/प्रतिनिधी-जालना शहरातील रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अंत्यत दुरावस्था झाली आहे. सदरील रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी परशुराम जन्म उत्सव समिती जालनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद त्रिंबकराव रत्नपारखी व ॲड. विनोद कुलकर्णी यांनी केली आहे.

याबाबत जालना शहर महापालिकेचे अति. आयुक्त गिराम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शहरातील रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत भयावह अवस्था आहे. पुलाखालील रस्त्याने अंत्ययात्रा घेवून जातांना दुःखात असलेल्या बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एखादवेळेस अंत्ययात्रेत स्वर्गरथाचा अपघात होवून दुर्घटना घडू शकते. त्यामुळे शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी व स्मशानभुमीसमोर वाहनाचा वेग नियंत्रीत रहावा यासाठी येथे वेग मर्यादा व दिशाफलक लावण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर इंजि. श्रीपाद रत्नपारखीख ॲड. विनोद कुलकर्णी, सिध्देश्‍वर पिंपरकर, मयुर लोखंडे यांनी केली आहे.

—-

संबंधित पोस्ट

महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी – सभापती प्रा. राम शिंदेकर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शिबिर संपन्न 

श्री महालक्ष्मी महिला शेतकरी गटाकडून 200 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती

vishwatmaklokswamivarta

श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्यासर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या* *सभापदी पदांची निवड संपन्न*

सोप्या गोष्टी अंगिकारून असह्य उन्हाळ्यात काळजी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख‌ रुपये खर्चाचा आराखडा तयार १ हजार १६ गावे, वाड्यांचा आराखड्यात समावेश 

vishwatmaklokswamivarta