vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा!इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा!इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

जालना/प्रतिनिधी-जालना शहरातील रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अंत्यत दुरावस्था झाली आहे. सदरील रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी परशुराम जन्म उत्सव समिती जालनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद त्रिंबकराव रत्नपारखी व ॲड. विनोद कुलकर्णी यांनी केली आहे.

याबाबत जालना शहर महापालिकेचे अति. आयुक्त गिराम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शहरातील रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत भयावह अवस्था आहे. पुलाखालील रस्त्याने अंत्ययात्रा घेवून जातांना दुःखात असलेल्या बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एखादवेळेस अंत्ययात्रेत स्वर्गरथाचा अपघात होवून दुर्घटना घडू शकते. त्यामुळे शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी व स्मशानभुमीसमोर वाहनाचा वेग नियंत्रीत रहावा यासाठी येथे वेग मर्यादा व दिशाफलक लावण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर इंजि. श्रीपाद रत्नपारखीख ॲड. विनोद कुलकर्णी, सिध्देश्‍वर पिंपरकर, मयुर लोखंडे यांनी केली आहे.

—-

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे-कृषी संलग्न विभागांचा सविस्तर आढावा ; कृषी विभागाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची स्वामी नारायण मंदिर येथे भेट* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत स्वामीनारायणाचे घेतले दर्शन

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा…