vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा!इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा!इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

जालना/प्रतिनिधी-जालना शहरातील रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अंत्यत दुरावस्था झाली आहे. सदरील रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी परशुराम जन्म उत्सव समिती जालनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद त्रिंबकराव रत्नपारखी व ॲड. विनोद कुलकर्णी यांनी केली आहे.

याबाबत जालना शहर महापालिकेचे अति. आयुक्त गिराम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शहरातील रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत भयावह अवस्था आहे. पुलाखालील रस्त्याने अंत्ययात्रा घेवून जातांना दुःखात असलेल्या बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एखादवेळेस अंत्ययात्रेत स्वर्गरथाचा अपघात होवून दुर्घटना घडू शकते. त्यामुळे शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी व स्मशानभुमीसमोर वाहनाचा वेग नियंत्रीत रहावा यासाठी येथे वेग मर्यादा व दिशाफलक लावण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर इंजि. श्रीपाद रत्नपारखीख ॲड. विनोद कुलकर्णी, सिध्देश्‍वर पिंपरकर, मयुर लोखंडे यांनी केली आहे.

—-

संबंधित पोस्ट

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दि. ०९ जुलै ते शुक्रवार दि. ११ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत तीन दिवसात साईंच्या चरणी अर्पण रु.६,३१,३१,३६२/-,सहा कोटी, एकतीस लाख, एकतीस हजार, तिनशे बासष्‍ट मात्र) इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

राज्यातील घरकुल योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देणार- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

भारतीय मानक विभागाच्या पथकाकडून विरारमधील प्रमाणपत्र नसलेले प्लायवूड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई

रानभाज्यांना राजश्रय देऊन गडचिरोली ब्रँड निर्माण करण्याची गरज – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात रानभाज्यांचे संवर्धन व विपणनावर भर

यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

संसद पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात…सरकारचं आवाहन – विरोधकांनी सहकार्य करावं