vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दिवाळी पहाट’ कार्यक्रम दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

दिवाळी पहाट’ कार्यक्रम दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

मुंबई, प्रतिनिधी : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या वतीने यंदा राज्यभर दहा ठिकाणी व दिल्लीतही ‘दिवाळी पहाट’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क, दादर येथे २१ ऑक्टोबर रोजी आणि कालिदास नाट्यगृह (मुलुंड) येथे २२ ऑक्टोबरला दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम साकारले जात आहेत.

दादर येथे आयोजित कार्यक्रमात जगदिश खेबुडकर, ग. दि. माडगुळकर व मंगेश पाडगांवकर यांच्या गाजलेल्या चित्रपट गीत व भावगीतांचा बहारदार कार्यक्रम ‘दिवाळी पहाट त्रिवेणी संगीत’ या विशेष संकल्पनेवर आयोजित सादरीकरण करण्यात येणार आहे. ख्यातनाम गायक दत्तात्रय मेस्त्री, अभिषेक नलावडे, प्रसिद्ध गायिका शाल्मली सुखटणकर, सोनाली कर्णिक, निवेदक अमित काकडे हे सादरीकरण करणार आहेत.

कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या बहारदार गीतांचा ‘दीप उत्सव दिवाळी पहाट’ या विशेष संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अजित परब, अभिषेक नलावडे, गायिका शाल्मली सुखटणकर व प्राजक्ता सातर्डेकर सहभागी होतील. निवेदन मिलिंद कुलकर्णी यांचे असून, संगीत संयोजन दीपक कुमठेकर आणि अमित गोठीवरेकर यांचे आहे.

सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, अधिकाधिक रसिकांनी या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे

0000

संबंधित पोस्ट

दसरा मेळावा पूर्वीच विवाद : ठाकरे आणि शिंदे गट भिडले, नाशिक-मुंबई रोडवर राडा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदीची मागणी-उपमुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !

मतदान प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या आर्थिक बाबींची सतर्कतेने तपासणी करावी – विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन निवडणूक खर्च अनुषंगिक यंत्रणांचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

देशात लोकशाही संपली असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून करावी. हुकूमशाही सुरू झाली आहे, सरकारची गुंडगिरी सुरू झाली आहे. अशा शब्दांत उद्धव ठाकरे  यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्याा  निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

vishwatmaklokswamivarta

सीआयआयच्या ‘आंतरराष्ट्रीय शिखर परिषदे’मध्ये राज्याच्या प्रगतीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

मुंबईपोलिस यांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाची कारवाई , साडेतेवीस लाख रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह दोन तरुण अटकेत..

vishwatmaklokswamivarta