vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जालना महानगरच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दौड ने साजरी..

भाजपा जालना महानगरच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दौड ने साजरी..

जालना (प्रतिनिधी) : भारताचे लोहपुरूष माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज दि.३१ ऑक्टोबर रोजी जालना शहरात जालना महानगर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून एकता दौड यात्रा घेऊन साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी जालना जिल्ह्याचे माजी अध्यक्ष रामेश्वर पाटील भांदरगे, माजी जालना महानगर जिल्हाध्यक्ष अशोक आण्णा पांगारकर, माजी शहराध्यक्ष राजेश राऊत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कामड, माजी नगरसेवक महावीर ढक्का माजी नगरसेविका सौ.संध्या देठे, सौ.कविता नागवे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर हि एकता दौड यात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते काद्राबाद-पाणीवेस-गरीबशाह बाजार-मस्तगड ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत घेण्यात आली. यावेळी एकता दौड यात्रेमध्ये जालना पोलीस दलातील जवानासह शहरातील तरुण, युवा व जेष्ठ नागरिक, महिला बंधू भगिनीं यांनी सहभाग नोंदवला. यात्रा समारोपानंतर वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले व या नंतर झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

यावेळी सर्वांना राष्ट्रीय एकता व अखंडतेची शपथ देण्यात आली व एक भारत श्रेष्ठ भारत ची घोषणा देण्यात आली. या कार्यक्रमास सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलीये, सुनील खरे, महेश निकम, संजय भगत, देविदास देशमुख, आनंद वाघमारे, अर्जुन गेही, प्रभुदास ठाकूर, जगदीश भरतिया, जिवन सले, कपिल भूरेवाल, संदीप नाईकवाडे, आनंद झारकंडे, उमेश अग्रवाल, राज स्वामी, सुरेंद्र शेडूते, प्रा.राजेंद्र भोसले, डोंगरसिंग साबळे, रवी अग्रवाल, शिवराज जाधव, रोहित भूरेवाल, संजय देठे, कल्याण भदनेकर, राजेश देसार, अजय मिसाळ, गणेश जल्लेवार, राजेश जटावाले, संजय पाखरे, शिवराम सतकर, केदार लाड, रोहित नलावडे, नारायण गोगडे, योगेश सामलेटी, शाम उगले, गणेश पणबिसरे, विशाल उफाड, विवेक पाटील, भुतेकर इत्यादीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

आयएमसी चेंबरच्या पुढाकाराने राजभवन येथे मियावाकी जंगल निर्मिती,राज्यपालांकडून आयएमसीच्या पर्यावरण रक्षण उपक्रमाचे कौतुक विद्यापीठांना व विद्यार्थ्यांना मियावाकी जंगल निर्माण कार्यात सहभागी करण्याची राज्यपालांची सूचना..

जागतिक सायकल दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अर्बन अड्डा २०२५ ला उपस्थिती लावली आणि “सायकलिंग, चिल्ड्रन अँड सिटीज” आणि “रोड टू सायकल२स्कूल” या पुस्तकांचं केलं प्रकाशन.

ठाणे जिल्ह्यात M-Sand धोरणाच्या अंमलबजावणी व प्रसिद्धीबाबतऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांविषयी शासन संवदेनशील*  *येणारा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा**- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

खरीप हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, खते व पीक कर्ज, उपलब्ध करुन द्या  – पालकमंत्री पंकजा मुंडे• जिल्ह्यात खरीप हंगामात 6 लाख 29 हजार हेक्टरवर होणार पेरणी..

vishwatmaklokswamivarta