vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- मा.मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड राजेंद्र सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली “न्याय आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.02 मार्च ते दि.30 मार्च 2026 या कालावधीत संपूर्ण रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत कार्यरत राहणार असून विविध तालुक्यांमध्ये जाऊन प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा तसेच नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ दि. 02 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता रायगड जिल्हा न्यायालय, अलिबाग येथे एस. आर. तिवारी, जिल्हा न्यायाधीश-2 यांच्या हस्ते संपन्न झाला.

या फिरत्या लोक अदालतीसाठी श्रीकांत उपाध्ये (निवृत्त न्यायाधीश) यांची कक्ष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश 3 रायगड अलिबाग एस.डी. भगत तसेच न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे तसेच अलिबाग वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष ए.डी.पाटील व सचिव अमित देशमुख आणि सर्व न्यायिक अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग उपस्थित होते

ही फिरती लोक अदालत दि. 30 मार्च 2026 पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जाऊन लोक अदालत आयोजित करणार असून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग राजेंद्र द.सावंत यांनी केले आहे. न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांना जलद सुलभ व विनामूल्य न्याय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देश या उपक्रमामध्ये आहे.

0000000

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन • फलोत्पादन योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान • प्रथम अर्ज, प्रथम लाभ तत्त्वावर निवड

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

लातूर येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ला प्रारंभ

जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा*१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी..

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई