vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिला दिनी ‘अस्मिता लीग’चे उद्घाटन; महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे -केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

महिला दिनी ‘अस्मिता लीग’चे उद्घाटन; महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे -केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: जागतिक महिला दिनानिमित्त महिलांमध्ये क्रीडाविषयी जागरूकता वाढावी आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना खेळांमध्ये अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आयोजित ‘अस्मिता लीग’ चे उद्घाटन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुल मैदानावर महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री खडसे यांनी सायकल स्पर्धा आणि वॉकेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (SAI) संचालिका डॉ. मोनिका घुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, फिट इंडिया ॲम्बेसेडर व बॉडीबिल्डर विक्रम जाधव तसेच क्रीडा अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला खेळाडू उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री खडसे म्हणाल्या की, देशाला 2036 पर्यंत विकसित भारत बनविण्याचे उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञानासोबतच नागरिकांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. युवा पिढीने स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असून विविध खेळांच्या माध्यमातून युवक-युवतींना निरोगी ठेवता येते. तंदुरुस्त युवा पिढीमुळे देश विविध क्षेत्रात प्रगती करू शकतो.क्रिकेटसह इतर अनेक खेळांमध्येही उज्वल भविष्य असून पालकांनी मुलांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून देशभरातील जिल्ह्यांमध्ये ‘अस्मिता लीग’चे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून महिलांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडू म्हणूनच नव्हे तर प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि इतर अनेक करिअरच्या संधीही उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंनाही अधिक संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रकारात यश संपादन करणाऱ्या मुलींचा मंत्री खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा क्षेत्रात विविध सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.

स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. मोनिका घुगे यांनी महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे यासाठी संस्था मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचे नमूद केले.

*********

संबंधित पोस्ट

राज्यात ठीक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहे#रायगड आज सकाळी ०६:०० वाजता जारी मध्यम वज्रवृष्टी व धक्क्याने वारे ४१-६१ किमी/तास जोरदार पाऊस > १५ मिमी/तास वैध वेळ: ०९:०० वाजेपर्यंत कृपया सावध रहा व सुरक्षित रहा!

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पर्जन्यमान) दि. ०८.०९.२०२५ (मि.मी.)सकाळी ८.०० वाजेपर्यंत

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात किमान ५ लाख उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न- कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा…

जाहिर प्रकटन-*विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी*

विधानसभा प्रश्नोत्तरे-परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी- पणन मंत्री जयकुमार रावल

भैय्यासाहेब देशमुख यांचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा- भैय्यासाहेबांसारखे अजातशत्रू व्यक्तिमत्व राजकारणात विरळा : हर्षवर्धन सपकाळ

vishwatmaklokswamivarta