vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

’माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

 

नांदेड प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी आणि निरोगी समाज निर्मितीसाठी ‘माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनानुसार, १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात या अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे.

१ एप्रिलला विशेष ग्रामसभेचे आयोजनअभियानाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच १ एप्रिल २०२६ रोजी, जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘विशेष आरोग्य ग्रामसभा’ आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ग्रामसभेमध्ये: * ग्रामस्थांना अभियानाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली जाईल. * आरोग्य, स्वच्छता आणि शुद्ध पाणीपुरवठा या विषयांवर चर्चा करून ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट केली जाईल. * लोकसहभागातून गाव ‘आरोग्य संपन्न’ करण्यासाठी सामूहिक संकल्प केला जाईल.

अभियानाचे स्वरूप व पुरस्कारहे अभियान केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजना आणि शाश्वत विकास ध्येयांशी (SDG-3) संलग्न आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, तालुका आणि जिल्ह्यांना राज्यस्तरावर कोट्यवधी रुपयांची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

13 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या वर्षातील तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 55 हजार 981 प्रकरणे निकाली काढण्यात यशठाणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर..

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य १ मे २०२५ पासून नव्या अटींची अंमलबजावणी..

विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील-घाट परिसरात 25-26 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज…विदर्भ (प्रामुख्याने पूर्व विदर्भ) आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ आणि नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे

vishwatmaklokswamivarta

जिल्हाप्रशासन देणार शेतकऱ्यांना ‘हात मदतीचा’

केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा-2025उमेदवारांनी/परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित अफवांवर विश्वास ठेवू नये…