vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एसएनएल कर्मचाऱ्यांच्या वेतन पुनरीक्षणासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांना निवेदन

एसएनएल कर्मचाऱ्यांच्या वेतन पुनरीक्षणासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांना निवेदन

       राज्य प्रतिनिधी   जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मधील कर्मचाऱ्यांच्या मागील नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतन पुनरीक्षणाच्या प्रश्नाबाबत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन सादर केले आहे.

            बीएसएनएल ही देशातील एक महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार संस्था असून, ग्रामीण, दुर्गम व वंचित भागांमध्ये दूरसंचार सेवा पोहोचविण्यात तिची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आहे. खासदार डॉ. काळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सुमारे ६० हजार बीएसएनएल कर्मचारी मागील जवळपास नऊ वर्षांपासून वेतन पुनरीक्षणापासून वंचित आहेत, ही अत्यंत गंभीर व अन्यायकारक बाब आहे.

केंद्र व राज्य शासन तसेच इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये नियमित वेतन पुनरीक्षण होत असताना बीएसएनएल कर्मचाऱ्यांवर होत असलेला हा भेदभाव त्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम करत असून त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेलाही बाधा निर्माण करत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले आहे.

तसेच, “अफोर्डेबिलिटी क्लॉज” या अटीमुळे वेतन पुनरीक्षणास विलंब होत असल्याचे निदर्शनास आणून देत, या अटीची पुनर्समीक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीएसएनएल ही केवळ व्यावसायिक संस्था नसून डिजिटल इंडिया, ग्रामीण कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक समावेशनासाठी महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार डॉ. काळे यांनी केंद्र सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन बीएसएनएल कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणी केली आहे. या प्रश्नाचा संबंध केवळ वेतनाशी नसून लाखो कुटुंबांच्या जीवनमानाशी आणि भविष्यासोबत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदाचे अंतिम आरक्षण जाहीर*

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या- थेट कर्ज योजनेसाठी 30 मार्च रोजी लॉटरीने निवड

भाकरीवाले पाटील महिला स्वयंसहाय्यता समूहाची यशस्वी वाटचाल

कॅनडातील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी विकासातील भागीदारीच्या नव्या उंची गाठतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या विविध संधींवर चर्चा

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- ना. प्रतापराव जाधव· ‘दिशा’ समितीची बैठक संपन्न· पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली

हरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने गावकऱ्यांच्या स्वप्नातील पूर बांधण्याचे कामाला सुरुवात व स्वच्छ पाणी देणाऱ्या RO प्लांटच्या कामाला सुरुवात… 👏🏻