vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे   –जिल्हाधिकारी किशन जावळे

यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे   –जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार 6 जून व तिथीनुसार 26 जून 2026 रोजी आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याने या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा-2026 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे बोलत होते.

या बैठकीस युवराजनी श्रीमती संयोगिता राजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती, दुर्गराज रायगड समितीचे सदस्य उपस्थित होते.जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक किल्ले रायगड येथे येत असतात. यावर्षी होणाऱ्या सोहळा कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात आहे. यावर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग,पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, प्रसाधनगृह, परिवहन व्यवस्था तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सूचित केले. तसेच पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गावर लाईट व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रमाराठी साउंड सिस्टम आदी कामे संबंधित विभागांनी पूर्ण करावे तसेच आवश्यक ते माहिती देणारे फलक लावले जावेत असे सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा संदर्भात शुद्धीपत्रक जारी…

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदारांचा सहभाग चांगला राहिला आहे, दुपारी ३:०० वाजेपर्यंत १२२ मतदारसंघांमध्ये अंदाजे ६०.४०% मतदान झाले.

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी अति मुसळधार पावसाचा (Orange Alert) इशारा दिला आहे, तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असाही इशारा आहे.

लातूर जिल्ह्यात 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा घेतला आढावा.. सिंचन प्रकल्पांची पाहणी करण्यासह संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना.

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान कार्डसाठी ३१ ऑगस्ट अंतिम मुदत

vishwatmaklokswamivarta