vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राहुरी पोटनिवडणुकीत प्रचारानंतर बाहेरील कार्यकर्त्यांवर निर्बंध

राहुरी पोटनिवडणुकीत प्रचारानंतर बाहेरील कार्यकर्त्यांवर निर्बंध

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी :- राहुरी विधानसभा पोटनिवडणूक २०२६ पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी प्रचार कालावधी संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरील राजकीय कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली असून हे निर्बंध २१ एप्रिल सायंकाळी ६ वाजल्यापासून २४ एप्रिलपर्यंत लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केले आहेत.

मतदारसंघात मुक्त व निष्पक्ष मतदानाचे वातावरण अबाधित राहावे यासाठी प्रचार संपल्यानंतर बाहेरील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, मिरवणूक व प्रचार पथकातील सदस्य यांना तत्काळ मतदारसंघ सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रशासनाकडून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कल्याण मंडप, मंगल कार्यालये व सामुदायिक सभागृहांची तपासणी करून बाहेरील व्यक्तींचा निवास आहे का याची पडताळणी केली जाईल. तसेच निवासगृह व अतिथिगृहांमधील राहणाऱ्यांची नोंद तपासली जाईल.याशिवाय मतदारसंघाच्या सीमांवर तपासणी नाके उभारून बाहेरील वाहनांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. संशयित व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्रांची तपासणी करून ते मतदार आहेत की नाही याची खात्री केली जाईल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.0

000

संबंधित पोस्ट

विधानसभा लक्षवेधी :माथाडी कामगार बोगस नोंदणी तपासणीसाठी विशेष मोहीम- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनवाचनातून मिळते प्रत्येकाला प्रेरणा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर विभाग ॲक्शन मोडवर – थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावणार !मालमत्ताकराचा भरणा तात्काळ करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन ; अन्यथा होणार कारवाई!

vishwatmaklokswamivarta

योजनेसाठी जमीन खऱेदी करणार : समाजकल्याण कार्यालय जमीनविक्रीस इच्छूकांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नाथषष्ठी यात्रोत्सव पूर्वतयारी बैठक-भाविकांना स्वच्छता,सुरक्षा व सेवा द्यावी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कुतूहलातून विविध विषयांवरील साहित्याची निर्मिती; राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे संमेलनाला शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta