vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौरवदेशात लवकरच १००टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार पुणे सातारा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौरवदेशात लवकरच १००टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार पुणे सातारा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

सातारा प्रतिनिधी – आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना माजी विधान परिषद सभापती व ज्येष्ठ आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले , खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री मकरंद पाटील यांनी स्वागत व प्रस्तावना केली.यावेळी पुरस्काराला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, हायड्रोजन इंधन हे देशाचे भविष्य आहे. शेतकऱ्यांनी आता केवळ अन्नदाता न राहता ऊर्जदाता आणि इंधनदाता व्हावे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञानाचे प्रयोग महत्त्वाचे ठरणार आहेत.

श्री. गडकरी पुढे म्हणाले की, देशात लवकरच १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने येणार असून त्यामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल आणि इंधन आयातीवरील खर्चात मोठी बचत होईल. तसेच पुणे ते सातारा प्रवास अवघ्या एका तासात, तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेतीन तासांत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. येत्या तीन वर्षांत देशातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शेती क्षेत्रात बायो इंधनाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे सांगताना त्यांनी पाणी संवर्धनावर विशेष भर दिला. पाणी हीच खरी संपत्ती आहे. जलसंधारणावर लक्ष दिल्यास शेतीचा विकास होऊन ती अधिक फायदेशीर ठरेल, असा विश्वासही केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी व्यक्‍त केला.

बायो इंधनाचा पर्याय सर्वांनी स्वीकारावा. लवकरच विमान वाहतूक क्षेत्रात बायो इंधनाचा वापर सुरू होईल. यामुळे भारत इंधन आयात करणारा नाही तर इंधन निर्यात करणारा देश होईल. देशात लवकरच वेस्ट प्लॉस्टीक पासून रस्ते बनविण्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाने लवकर कारवाईचे आश्वासन

जागतिक ग्राहक दिनानिमित्त विशेष लेख :जागतिक ग्राहक हक्क दिन : “Safe Products, Confident Consumers”

तामिळनाडूत मोठी उलथापालथ, थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाची पदार्पणातच दणदणीत कामगिरी

फुले दाप्त्यांना अपेक्षित मानवसेवा पैकी एक निराधार वृद्धांची सेवा होय-प्रताप भांबळे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त धान्य कोठी भेट…

जिल्हा शिक्षक पुरस्कार विजेत्यांचा गौरव सोहळा संपन्न;शिक्षणातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढवा 

vishwatmaklokswamivarta

87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात #विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न