vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

पुणे प्रतिनिधी

इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरामुळे सुमारे ११ हजार लिटर डिझेलची दैनंदिन बचत -विभाग नियत्रंक अरुण सिया,माहे मे २०२६ पासून पेट्रोल, डिझेल व सीएनजी इंधनामध्ये झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने आगार पातळीवर डिझेल बचतीसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. विभागात १०५ इलेक्ट्रिक वाहने असून दैनंदिन ४६ हजार २३२ किलोमीटर चालनात येतात, त्यामुळे जवळपास १० हजार ९८१ लिटर डिझेलची दैनंदिन बचत होत आहे. येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर पूर्णक्षमतेने करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती विभाग नियत्रंक अरुण सिया यांनी दिली आहे.

 

पुणे विभागातील आगारांना आगार पातळीवर उद्दिष्टे निश्चित करुन देण्यात आलेली आहे. प्रत्येक आगाराने मागील वर्षाच्या तुलनेत १ ने किलोमीटर प्रति १० लिटरमध्ये (केपीटीएल) वाढ करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या फेऱ्यांचे उत्पन्न कमी झालेले आहेत त्या फेऱ्या तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आल्या आहेत. विभाग किंवा आगार पातळीवर चालकांच्या केपीटीएलमध्ये वाढ होण्याकरीता त्यांना प्रबोधन करण्यात येत आहे तसेच वरिष्ठ पातळीवरुन मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती श्री. सिया यांनी दिली आहे.

0000

संबंधित पोस्ट

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निर्देश

बाह्य यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा प्रभावीपणे राबवा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’चे पुणे येथे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा महिला, बाल विकास सनियंत्रण समिती बैठकबालकामगार ,बालभिक्षेकरी व शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आज वेव्हज् परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 1 मे रोजी मुंबईत

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन