३ जून २०२६ पासून जर्मनीमार्गे हवाई प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ट्रान्झिट व्हिसाची अट रद्द करण्यात आली आहे.
राज्य प्रतिनिधी-३ जून २०२६ पासून जर्मनीमार्गे हवाई प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ट्रान्झिट व्हिसाची अट रद्द करण्यात आली आहे
जानेवारी २०२६ मध्ये जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे भारत-जर्मनी जनसंपर्क अधिक दृढ होण्यास मदत होईल तसेच युरोप आणि इतर देशांकडे प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.